Thursday, April 30, 2020

वेळवट्टीत गव्याच्या हल्ल्यात दोघे जखमी


आजरा (प्रतिनिधी) :

वेळवट्टी (ता. आजरा) येथे शेती काम करणार्‍या दोघांवर गवा रेड्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही जण जखमी झाले आहेत.  संभाजी बाबुराव कुंभार (वय ४२),  संभाजी लक्ष्मण मांगले (वय४८) (दोघेही रा. वेळवट्टी) हे दोघेही गावानजिकच्या रांगी नावाचे शेतात ऊस भांगलण करत होते. यावेळी अचानक ऊसातून गव्याने येऊन संभाजी मांगले यांना जोराची धडक दिली. त्या धडकेत त्यांचे डाव्या डोळ्याचे वरील बाजूस गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांचे सोबत असलेले संभाजी कुंभार यांनाही गव्याने जोराची धडक दिली. त्यात कुंभार यांच्या डाव्या कुशीत शिंग घुसविले. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. जखमी वर ग्रामीण रुग्णालय आजरा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गडहिंग्लज येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आजर्‍याचे वनक्षेत्रपाल डॉ. सुनील लाड, वनपाल डी. बी. काटकर, सुरेश गुरव, वनरक्षक कृष्णा डेळेकर, तानाजी कवळीकट्टी यांनी जखमींची भेट घेऊन विचारपूस  केली.

बातमी व जाहिरात करिता संपर्क :
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी


कोल्हापूर (प्रतिनिधी) : 

अखेर कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. सदर मयत इचलकरंजी मधील कोरोना रुग्ण आहे. गुरूवारी संध्याकाळी चार वाजता मृत्यू झाला. 20 एप्रिल रोजी रुग्णाला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आल होते. सदर व्यक्ती 60 वर्षांची होती. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोरोना रुग्ण व्हेंटिलेटरवर होता. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना अखेर अपयश आले. औपचारिक बाबींची पूर्तता करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. 

बातमी व जाहिरात करीता संपर्क 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

हरपवडेत बिबट्या सदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात शेळी ठार


आजरा (प्रतिनिधी) :

हरपवडे पैकी धनगरवाडा (ता. आजरा) येथे बिबट्या सदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाली. सदर घटना बुधवार (दि. २९) रोजी  सायंकाळी घडली. याबाबत माहीती अशी, धनगरवाड्यावरील रामू नवलू झोरे हे बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे पाळीव शेळ्या घेऊन चारावयास गेले होते. यावेळी शेळ्या चरत बोडेकर नंबर नावाच्या शेतात गेल्या. याठिकाणच्या आनंद नाना हर्षवर्धन  यांच्या शेतात शेळ्या चरत असताना बिबट्या सदृश्य प्राण्याने कळपावर हल्ला केला. यात एक अंदाजे चार वर्ष वयाची मादी शेळी जागीच ठार झाली. यामुळे झोरे यांचे साधारणतः पाच हजाराचे नुकसान झाले. सदर घटनेची माहीती मिळताच आजर्‍याचे परिक्षेत्र वन अधिकारी डॉ. सुनील लाड, वनपाल अशोक राऊत, वनरक्षक प्रतिभा पाटील यांनी पंचनामा केला तर पशुधन विस्तार अधिकारी डॉ. जालकर यांनी शवविच्छेदन केले.

कोल्हापूरात आणखी एक तरूण कोरोना पॉझिटिव्ह; तरूण मूळचा हैदराबादचा


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

 मुंबईहून हैदराबादकडे निघालेल्या तरूणाला कोल्हापूरात अडविण्यात आले. सदर तरूणाची कोरोनाची चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  हा अहवाल बुधवारी (दि. २९) रात्री उशिरा प्राप्त झाला आहे. हा युवक २५ वर्षीय आहे. त्याचे मूळगाव हैदराबाद आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १३ झाली आहे. जिल्हाबंदी असल्याने सदर युवक ट्रकने मुंबईहून हैदराबादला जाणार होता. मात्र तो प्रथम ट्रकने रत्नागिरीला गेला. तेथून कोल्हापूर मार्गे हैदराबादला जाणार होता. मात्र रत्नागिरीहून कोल्हापूरात येत असताना सदर युवकाला सोमवार (दि. २७) रोजी पोलीसांनी ताब्यात घेतला. त्याची तपासणी करून मंगळवारी त्याचा स्वॅब घेण्यात आला. त्याचा अहवाल बुधवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला. जिल्हाबंदी असतानाही अवैध प्रवास करणार्‍या अनेकांना कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतले. आतापर्यंत तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सदर हैदराबादचा युवक तसेच कर्नाटक हसन शहराकडे जाणार्‍या कंटेनरमधील दोघांचा समावेश आहे.

बातमी व जाहिरात करिता संपर्क :
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

Wednesday, April 29, 2020

एकाच बॉलवर १५ जण आऊट; आजरा तालुक्यातील प्रकार


आजरा (प्रतिनिधी) :

सध्या सर्वत्र कोरोनोचा हाहाकार असल्याने लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यातच राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा देखील लागू करण्यात आला आहे. यामुळे जमावाने फिरणे, गप्पा मारणे किंवा विनाकारण एकत्र येणे गुन्हा ठरतो. असे असताना देखील मुंगुसवाडी (ता. आजरा) येथील १५ तरूण गणेश देव नावाच्या शेतात चक्क क्रिकेट खेळण्यासाठी एकत्र जमले. सामना ऐन रंगात आला असताना बॉलीग करण्याच्या कारणावरून तरूणात वाद झाला. अन् हा वाद थेट आजरा पोलिसात पोहचला. यानंतर पोलीसांनी वादाचे खरे कारण क्रिकेट असल्याचे शोधून काढले. यातून क्रिकेट खेळणार्‍या १५ युवकांवर संचारबंदी आदेशाचे उल्लंघन आजरा पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे. तसेच सदर १५ युवकांना १४ दिवस होम क्वाँरटाईन करण्यात आले आहे. या एकाच बॉलवर १५ जण आऊट झाल्याच्या प्रकाराची तालुक्यात जोरदार चर्चा आहे.



बातमी व जाहिरात करिता संपर्क :
विकास डिजिटल मिडीया
7410168989

आकुर्डेच्या व्यक्तीचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह; भुदरगड तालुक्यात खळबळ

 

गारगोटी (प्रतिनिधी) :

आकुर्डे (ता. भुदरगड) येथील ५४ वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे भुदरगड तालुक्यात खळबळ उडाली आहे. सदर अहवाल मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १२ झाली आहे. सदर व्यक्ती मुंबई येथे चालक म्हणून काम करते. सावंतवाडी तालुक्यातील रूग्ण घेऊन तो आला होता. १६ एप्रिल रोजी त्याला कडगाव (ता. भुदरगड) आरोग्य केंद्रात त्याला क्वांरटाईन केले होते. पण १४ दिवस पुर्ण होण्याआधीच त्याचा अहवाल मंगळवारी रात्री उशीरा पॉझिटिव्ह आला. रात्री दीड वाजता सदर व्यक्तीला सीपीआरच्या विशेष कक्षात दाखल करण्यात आले.


बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

Tuesday, April 28, 2020

बेस्टच्या १५ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण


मुंबई (प्रतिनिधी) :
मुंबई महानगरपालिकेचा महत्वाचा विभाग असणार्‍या बेस्टच्या एकूण १५ कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. सात कंडक्टर, चार बेस्ट ड्रायव्हर, दोन बेस्ट विद्युत विभाग कर्मचारी, दोन परिवहन अभियांत्रिकी विभागातील कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत.

बातमी व जाहिरात करिता संपर्क : 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

Sunday, April 26, 2020

माले येथील शेतात विद्युत तारेच्या धक्याने बापलेकांचा मृत्यू


पन्हाळा (प्रतिनिधी) :

मसुदमाले (ता. पन्हाळा) येथील मळा नावाच्या शेतात वैरण आणण्यासाठी गेलेवर शेतात उभा असलेल्या विद्युत खांबाचा ताण काढलेल्या तारेला स्पर्श होऊन लागलेल्या शॉकने बाबासो पांडुरंग पाटील वय ४८ रा. महादेवनगर माले यांचा व त्यांना वाचवावयास गेलेला मुलगा कु. राजवर्धन वय १६ याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी ८ .३० वा. ही घटना घडली या घटनेने मालेसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


माले येथील मळा नावाच्या शेतातून ११ किं.वॅटची विद्युत वाहिनी गेली आहे या शेतात असलेल्या विद्युत खांबाचा ताण काढण्यासाठी स्वतंत्र दुसऱ्या तारेचा वापर करून ती शेतात रोवली आहे याच तारेला बाबासाहेब यांचा स्पर्श झाला त्यात त्याचे दोन्ही पाय गुडग्या पर्यन्त पूर्णता जळाले होते त्यातच ते गतप्राण झाले त्याना याक्षणी वाचवाव्यास गेलेला मुलगा कु. राजवर्धन याचेही  विजेच्या धक्याने निधन झाले. अक्षयतृतियाच्या सन सकाळीच बापलेकांचा झालेला मृत्यू ह्रदय पिळवटणारा ठरला बाबासाहेब पाटील हे मुळचे उत्रे ता. पन्हाळा येथील परंतु माले गांवचे जावई लग्नानतंर ते कायमस्वरूपी रहायला माले येथे आले होते.

बातमी व जाहिरात करिता संपर्क :
विकास मिडीया न्यूज 
7410168989

Saturday, April 25, 2020

कोल्हापूराच्या नागाळा पार्कातील तरूण कोरोना पॉझीटीव्ह; शहरात 19 दिवसांनी आढळला रूग्ण


कोल्हापूर (प्रतिनिधी) : 

कोल्हापूर शहरात यापुर्वी सापडेले कोरोनाग्रस्त दोन रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर तिसरा रूग्णही कोरोनामुक्त झाला असतानाच शनिवारी (दि. २५)  शहरातील नागाळा पार्क परिसरातील एका 38 वर्षीय तरूणाचा कोरोनाचा अहवाल पॉझीटीव्ह आला. या तरूणांसह अन्य तिघे असे चौघेजण आजच इराणहून कोल्हापुरात आले होते, यातील तिघांचा अहवाल मात्र निगेटीव्ह आला आहे. दरम्यान, शहरात तब्बल 19 दिवसांनी कोरोना पॉझीटीव्ह सापडल्याने शहर कोरोनामुक्त झाल्याच्या आनंदात असलेल्या शहरवासियांना धक्का बसला आहे. या तरूणाच्या स्वॅबची चाचणी कोल्हापुरातील शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेत करण्यात आली आहे.

बातमी व जाहिरात करिता संपर्क :
विकास मिडीया न्यूज 
7410168989

Friday, April 24, 2020

शुक्रवारी मुंबईत करोनाचे ३५७ नवे रुग्ण, संख्या ४ हजार ५८९


मुंबई (वृत्तसंस्था) :

शुक्रवारी मुंबईत करोनाचे ३५७ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील रुग्णांची संख्या ४ हजार ५८९ इतकी झाली आहे. २४ तासात ११ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत एकट्या मुंबईत करोनाची लागण झाल्याने १७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. आत्तापर्यंत ५९५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ज्या ११ रुग्णांचा मृत्यू झाला त्यापैकी सात रुग्णांना इतर गंभीर आजाराची हिस्ट्री होती. ११ मृत रुग्णांपैकी सात पुरुष तर चार महिला होत्या. या ११ मृत्यूंपैकी एक मृत्यू ८० वर्षांच्या वरील रुग्णाचा होता. तर एक मृ्त्यू ४० वर्षांखालील रुग्णाचा होता. इतर नऊ मृत्यू हे ४० ते ६० या वयोगटातील रुग्णांचे होते असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
विकास मिडीया न्यूज 
7410168989

गडहिंग्लजातील सुभाष थिएटरमधील जुगारावर छापा


गडहिंग्लज (प्रतिनिधी) :

गडहिंग्लज शहरातील सुभाष थिएटरमध्ये चाललेल्या जुगारावर पोलीसांनी छापा टाकला.  याप्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आले. तसेच ७ लाख ७२ हजार ५७० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये रोख रकमेसह सहा मोटारसायकल, दहा मोबाइल, जेवनाचे साहित्य आदी जप्त करण्यात आले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी करण्यात आली.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
विकास मिडीया न्यूज 
7410168989

सांगलीत सलग दुसऱ्या दिवशी लैंगिक अत्याचाराची घटना


सांगली (प्रतिनिधी) :

संचारबंदीत सलग दुसऱ्या दिवशी सांगली जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याचा आरोप आहे. बेडग येथे एका सहावीतील मुलीवर जबरदस्ती करण्यात आल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन मोबाईलवर तिचे अश्लिल फोटो काढल्याचा आरोप आहे. याप्रकरणी लक्ष्मण कारंडे (वय 25) नावाच्या नराधमास अटक करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिरज तालुक्यातील बेडग गावात एक 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या चुलती कडे आली होती. लॉकडाऊन असल्याने ती बेडगमध्येच अडकून पडली. रात्री लघुशंकेसाठी ती घराबाहेर आली. त्यावेळी लक्ष्मण कारंडे नावाच्या व्यक्तीने तिला जबरदस्ती बेडगमधील अंगणवाडी शाळेच्या बाथरुम नेले. तिथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीचे लैंगिक शोषण करुन या नराधमाने मोबाईलवर तिचे अश्लिल फोटोही काढले, असा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी लक्ष्मण कारंडे याला अटक करुन त्याविरोधात लैंगिक शोषण आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीला सिव्हील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तपासणीनंतरच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, संचारबंदीत सलग दुसऱ्या अत्याचार झाल्याची तक्रार आल्याने शहरात खळबळ  उडाली आहे.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
विकास मिडीया न्यूज 
7410168989

Thursday, April 23, 2020

कसबा बावड्यातील महिला कोरोनामुक्त


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

कोल्हापूर शहरातील कसबा बावड्याच्या मराठा कॉलनीतील ६३ वर्षीय महिलेला कोरोना झाला होता. १४ दिवसाच्या उपचारानंतर गुरूवारी (दि. २३) रोजी सदर महिलेचा सलग दुसर्‍या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे सदर महिला कोरोनामुक्त झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. यामुळे जिल्ह्यातील तिसरा कोरोनाचा रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने दिलासा मिळाला आहे.

मिरजेत लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणीवर बलात्कार


मिरज (प्रतिनिधी) :

लॉकडाऊनमुळे सांगली जिल्ह्यातील मिरज येथे मैत्रिणीकडे थांबलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील एका १९ वर्षीय तरुणीवर बलात्काराची घटना घडली. बलात्कार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत महात्मा गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पीडित तरुणी गेल्या काही दिवसांपासून मिरजेतील मैत्रिणीकडे वास्तव्यास होती. बुधवारी रात्री तिला मद्य पाजून तिच्यावर दोघांनी बलात्कार केल्याची घटना घडली. याबाबत पीडितेने पोलिसात  दोघांविरोधात फिर्यात दाखल केली असून महात्मा गांधी चौक पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Wednesday, April 22, 2020

संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोल्हापूरातील राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात तक्रार


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

कोरोनाबाधित बेळगावच्या रेड झोन मधून चंदगड तालुक्यात प्रवेश केला. तसेच संचारबंदी असताना देखील गर्दी जमवून चंदगड शहरात शिवभोजन केंद्राचे उद्घाटन केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्याविरोधात  चंदगड पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार अॅड. संतोष मळवीकर यांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस काय भूमिका घेतात याकडे सार्‍यांचेच लक्ष लागून राहिले आहे.

Tuesday, April 21, 2020

इचलकरंजीतील त्या वृध्दाच्या चार वर्षीय नातवाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह


इचलकरंजी (प्रतिनिधी) :

सोमवारी सकाळी इचलकरंजीच्या कोलेमळा परिसरातील ६० वर्षाच्या वृध्दाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यामुळे शहरात खळबळ उडाली असतानाच मंगळवारी रात्री उशीरा त्या वृध्दाच्या चार वर्षीय नातवाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरवासियांचे धाबे दणाणले आहेत. सोमवारीच कोरोनाबाधीत व्यक्तीच्या घरातील सर्वांची तपासणी करण्यात आली. सर्वांचे स्वाब तपासणी करीता पाठविण्यात आले. यात चार वर्षाच्या नातवाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. इतर सदस्यांचे अहवाल येणे बाकी आहे.

बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी संपर्क :
विकास मिडीया न्यूज 
7410168989

संकेश्वरमधील आणखी एक तरूणी कोरोनाबाधित


बेळगाव (प्रतिनिधी) :

बेळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात एकही कोरोनाचा रूग्ण सापडला नसल्याची दिलासादायक बातमी असताच मंगळवारी संध्याकाळी संकेश्वर शहरात एका तरूणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. सदर २५ वर्षीय तरूणीला संकेश्वर शहरातील सापडलेल्या पहिल्या रूग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सीमाभागात कोरोनाचा दुसरा रूग्ण सापडल्यामुळे महाराष्ट्रातील विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील सीमाभागाला लागून असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  


बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
विकास मिडीया न्यूज 
7410168989

ऑनलाइन फसवणूकीपासून सावध रहा; महाराष्ट्र सायबर विभागाचे आवाहन


मुंबई (विशेष प्रतिनिधी) :

 कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून राज्यात 242 गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली

सध्या लॉकडाउनच्या काळात बरेच व्हाटसॲप मेसेजेस फिरत आहेत. या मेसेजेस मध्ये लोकांना एकतर मोबाईल रिचार्ज ऑनलाईन करण्यासाठी, किंवा कोणत्याही वेबसेरीजचे सदस्य subscription स्वस्तात आहे, खालील लिंकवर क्लिक करा असा मजकूर असतो व एक लिंक दिली असते. आपण कोणीही अशा लिंक्सवर क्लिक करू नये. कारण सदर लिंक्स व मेसेजेस हे सायबर गुन्हेगारांची लोकांना फसविण्याची नवीन युक्ती आहे.


तुम्ही जर त्या लिंकवर क्लिक केले तर एक फॉर्म उघडतो ज्यात तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट्सचे सर्व डिटेल्स, पासवर्डस, डेबिट/क्रेडिट कार्ड्सची माहिती, पिन क्रमांक सर्व विचारले जाते. तुम्ही ही सर्व माहिती दिली की, एक ओटीपी येतो व तो जाणून घेण्यासाठी एक फोन येतो. पलीकडून संभाषण करणारी व्यक्ती आपण त्या कंपनीमधूनच बोलतोय असा आभास निर्माण करून तो ओटीपी , तुमच्याकडून काढून घेते व काही वेळाने तुम्हाला तुमच्या बँकेचा एसएमएस येतो की तुमच्या खात्यातून काही रक्कम अनोळखी खात्यात वळविली गेली आहे.

त्यामुळे सर्व नागरिकांनी अशा कोणत्याही खोट्या मोहात फसू नये. तसेच जर आपण चुकून फसविले गेले असाल तर त्याची तक्रार नजीकच्या पोलीस ठाण्यात करावी व www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर (website )पण नोंद करावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.

बातम्यासाठी व जाहिरातीसाठी संपर्क :
7410168989

सोशल डिस्टंसिंगचे पालन करत राज्यातील दारुची दुकाने उघडणार?


मुंबई  (प्रतिनिधी) :

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील दारूची दुकाने गेल्या महिनाभरापासून बंद आहेत. दारूची दुकाने बंद असल्याने मद्यपींची गैरसोय झाली आहे. दरम्यान, राज्यातील मद्याची दुकाने सोशल डिस्टंसिंगचे पालन करून सुरू करण्यात येतील, असे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.


 फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना राजेश टोपे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, जर सोशल डिस्टंसिंगचे योग्य प्रकारे पालन होणार असेल तर दारूच्या दुकानांवर बंदी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.' मात्र ही दुकाने नेमकी कधीपासून सुरू होतील, याबाबत आरोग्यमंत्र्यानी माहिती दिली नाही.

Monday, April 20, 2020

कोल्हापूर जिल्ह्यातून ऊस तोडणी कामगारांची मूळगावी पाठवणी

 
कोल्हापूर  (प्रतिनिधी) :

 राज्य शासनाच्या निर्णयानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगारांना एसटीच्या माध्यमातून त्यांच्या जिल्ह्यांमध्ये पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतर जिल्ह्यातील ११ हजार ५०० कामगार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करत होते. या सर्वांना त्यांच्या जिल्ह्यात पाठविण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.


दोन दिवसात हे सर्व कामगार आपआपल्या जिल्ह्यामध्ये पोहोचतील, असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, तेथे गेल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी होईल आणि तेथील प्रशासन त्यांची काळजी घेईल. त्याचबरोबर परराज्यातील २ हजार ५०० कामगारांची जिल्ह्यातील निवारागृहांमध्ये व्यवस्था केली आहे. त्यांना सोडण्याबाबत केंद्र शासनाच्या अजून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. ज्यावेळी सूचना येतील त्यावेळी त्याबाबत कार्यवाही केली जाईल तोपर्यंत त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे, असेही पालकमंत्री म्हणाले.

कोल्हापूर जिल्हा बँकेचे अधिकारी अपघातात ठार


गडहिंग्लज (प्रतिनिधी) :

गडहिंग्लज येथील डॉक्टर कॉलनीमधील रहिवाशी आणि कोल्हापूर जिल्हा बँकेचे किणे (ता. आजरा) शाखेचे शाखाधिकारी  रणजित लक्ष्मण कांबळे (रा. सुळे ता. आजरा) यांचे सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास अपघाती निधन झाले.

रणजित कांबळे हे आपल्या दुचाकीवरून गडहिंग्लज येथून किणे शाखेकडे चालले होते. महागावनजिकच्या लाकुडवाडी घाटात लाकुडवाडी गावच्या थांब्यापासून काही अंतरावर गाडीचा ताबा सुटल्याने रणजीत  कांबळे रस्त्याच्या बाजूच्या झाडाला जोरदार धडकल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, पण त्यापूर्वीच ते मयत झाल्याचे आढळून आले. रणजित कांबळे सुळेचे दोन वर्षे सरपंच होते तर महात्मा फुले सेवा संस्थेचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक  होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. अपघाताचे वृत्त कळताच गडहिंग्लज आणि सुळे येथे हळहळ व्यक्त होत आहे.


बातम्यांसाठी संपर्क :

7410168989

मुंबईत ५३ पत्रकारांना करोनाची लागण


मुंबई (प्रतिनिधी) :

पोलिस, डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनंतर आता पत्रकारांनाही करोनाची लागण झाली आहे. मुंबईमध्ये ५३ पत्रकारांना करोनाचा संसर्ग झाला आहे. गेल्या आठवड्यात पत्रकार संघानं मुंबईतील पत्रकार आणि कॅमेरामन यांच्या करोना चाचणीसाठी कॅम्प आयोजित केला होता. त्यामध्ये १६८ जणांची करोना चाचणी घेण्यात आली. रविवारी मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार १६८ पैकी ५३ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. करोनाचा संसर्ग झालेले बहुतांश पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियातील असल्याचे माहीती समोर आली आहे.


मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले यांनी दिलेल्या माहितीनुसार १६८ पत्रकारांची करोनाची चाचणी घेण्यात आली. त्यापैकी ५३ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

कोल्हापूरात पकडलेल्या त्या कंटेनरमधील आणखी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

मुंबईहून हसन (कर्नाटक) येथे जाताना कोल्हापूरमध्ये एक कंटेनर पकडन्यात आला होता. या तपासणी केलेल्या कंटेनर मधील ४२ वर्षीय महिलेलाही कोरोना झाल्याचे स्पष्ट सोमवारी सकाळी स्पष्ट झाले. रविवारी याच कंटेनरमधील पुरूषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. चार दिवसांपूर्वी हा कंटेनर पेठ वडगांव येथे पकडला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ९ झाली असून त्यापैकी तीन रूग्ण बरे झाले आहेत.

राज्यात आजपासून अंशत: व्यवहार; मात्र जिल्ह्य़ांच्या सीमा बंदच


मुंबई (वृत्तसंस्था) : 

राज्यात सोमवारपासून करोनाचा धोका नसलेल्या भागांत अटी-शर्तीसह काही प्रमाणात व्यवहार सुरू करत आहोत. मात्र जिल्ह्य़ांच्या सीमा बंदच राहतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी स्पष्ट केले. सर्दी, ताप आणि खोकला यांसारखी लक्षणे दिसताच घरी उपचार करू नका, रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्या. तापाच्या दवाखान्यांमध्ये जाऊन दाखवावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी थेट संवाद साधला. करोनाचे रुग्ण आणि प्रादुर्भाव लक्षात घेऊन सरकारने सोमवारपासून काही अटींवर केशरी (तुरळक करोना रुग्ण सापडलेले) व हिरव्या (अजूनपर्यंत करोनामुक्त असलेले) निर्धारित क्षेत्रातील जिल्ह्य़ांत उद्योग सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यासाठी त्यांना आवश्यक असलेला कच्चामाल आणि अन्नधान्य पुरवण्यात येईल. आपल्याला मालवाहतूक सुरू करायची आहे, विषाणूंची वाहतूक करायची नाही. कोणताही धोका स्वीकारायचा नाही. यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारने जे आदेश निर्गमित केले आहेत त्यांचे तंतोतंत पालन केले जाईल हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्य़ांच्या सीमा बंदच राहतील. राज्यातील नागरिकांसाठी ही टाळेबंदी संपलेली नाही. ३ मेपर्यंत त्यांनी आहे तसेच घरी राहायचे आणि सामाजिक अंतराची शिस्त पाळायची आहे. तर टाळेबंदीमुळे अडकलेल्या इतर राज्यांतील तसेच राज्यातील मजुरांनी आहे तिथेच राहावे, राज्य सरकार त्यांची पूर्ण काळजी घेईल, तुम्हाला सुखरूप घरी पाठवण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे, असा विश्वासही त्यांनी दिला. शिधापत्रिकेवर तांदुळासोबत गहू आणि डाळीची आपण केंद्र सरकारकडे मागणी केली असून ते मिळताच वाटप सुरू करणार असल्याचे ते म्हणाले.

सामाजिक दायित्व निधीची रक्कम देण्यासाठी स्वतंत्र सीएसआर खाते उघडले असल्याचीही माहिती ठाकरे यांनी दिली. बऱ्याच वेळा रुग्ण शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात येत आहेत. त्यांचे चाचणी अहवाल येण्याआधी दुर्दैवाने काही जणांचे मृत्यू झाले आहेत. अशांसाठी आपण इच्छा असून काही करू शकत नाही, अशी खंत ठाकरे यांनी व्यक्त के ली. सर्दी, ताप आणि खोकला यांसारखी लक्षणे दिसताच घरी उपचार करू नका, रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्या. वेळेत योग्य उपचार झाले तर रुग्ण मोठय़ा संख्येने बरे होऊन घरी जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Sunday, April 19, 2020

महाराष्ट्र राज्यात रविवारी कोरोनाचे 552 नवे रुग्ण


मुंबई (वृत्तसंस्था) :

देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवारी दिवसभरात करोनाने 12 जणांचा बळी घेतला असून, तब्बल 552 नव्या रुग्णांची भर पडली आहे. याचबरोबर करोनाबाधितांची राज्यातील एकूण संख्या आता 4 हजार 200 वर पोहचली आहे. आतापर्यंत 223 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर 507 जणांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी पाठण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.


देशभरात मागील चोवीस तासांत करोनामुळे 31 जणांचा मृत्यू झाला. तर 1 हजार 324 नवे रुग्ण आढळले आहेत. देशातील करोनाबाधितांचा एकूण आकडा 16 हजार 116 वर पोहचला आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 13 हजार 295 रुग्ण, रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलेले 2 हजार 302 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 519 जणांचा समावेश आहे. 

उध्दव ठाकरेंची विधानपरिषदेवरील नियुक्ती राज्यपालांना बंधनकारक


मुंबई  (वृत्तसंस्था) :

उत्तर प्रदेशातील १९६१ मधील खटला आणि घटनेतील तरतुदींनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त आमदार करणे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांना बंधनकारक आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर अनिश्चिततेचे सावट असल्याची चर्चा निरर्थक ठरणार आहे.२७ मे २०२० पूर्वी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांपैकी एका सभागृहाचे सदस्य होणे मुख्यमंत्री ठाकरे यांना बंधनकारक आहे. सध्या राज्यपाल नियुक्त दोन जागा रिक्त असून त्यातील एका जागेवर ठाकरे यांची नियुक्ती करण्याची शिफारस मंत्रिमंडळाने केली आहे. मात्र राज्यपालांनी अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

अमेरिका एक-एक नागरिकाच्या मृत्यूचा बदला घेणार?; ट्रम्प यांची चीनला धमकी


वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) :

कोरोना व्हायरसप्रकरणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनना खुले आव्हान दिले आहे. कोरोना जाणिपूर्वक पसरवला असेल चर चीनला याचे परिणाम भोगावे लागतील असे ट्रम्प म्हणाले आहेत. शनिवारी पत्रकारांशी बोलताना हे विधान केले. जर ही चूक असेल तर चूक ही चूक असते. पण कोरोना जर जाणिवपूर्वक पसरवला असेल तर चीनला याचे परिणाम भोगावे लागतील.

शनिवारी व्हाईट हाऊस येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जर ते (चीन) जाणूनबुजून हा विषाणू पसरवण्यास जबाबदार असल्याचे समोर आले तर त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. १९१७ नंतर कोणीच इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याचे पाहिलेले नाही, असे ते म्हणाले. त्यांनी म्हटले की, कोविड-१९ जगभरात पसरण्यापूर्वी चीनबरोबर आमचे संबंध चांगले होते. परंतु, या प्रकारामुळे आता खूप फरक पडला आहे. चीनवर आपण नाराजही असल्याचे त्यांनी सांगितले.

वुहानमध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचे आकडे समोर आणले. यानंतर चीनवर जगभरातून टीका होत आहे. चीनने जाहीर केलेले मृतांचे आकडे पारदर्शक नसल्याचे सांगत ट्रम्प आणि त्यांचे ज्येष्ठ सहकाऱ्यांनी टीका केली. चीनमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्युच्या संख्येवर देखील ट्रम्प यांनी शंका घेतली.

कोरोना विषाणूच्या संकटामुळे प्रत्येकाचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत जगात सर्वांत मोठी आमची अर्थव्यवस्था होती. चीन आमच्या आसपासही नव्हता, हे सांगताना ते पुढे म्हणाले की, इराण आधीपेक्षा एक अत्यंत वेगळा देश झाला आहे. पूर्वी इराण पश्चिम आशियावर आपला अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करत होता. आता तो फक्त जगू इच्छितो, अशा शब्दांत अप्रत्यक्ष इशारा त्यांनी दिला.

कोल्हापुरात आणखी एक कोरोनाचा रुग्ण

कोल्हापूर (प्रतिनिधी) :
कोल्हापुरातील पहिले दोन कोरोना रुग्ण बरे झाले असताना आज (रविवार) आणखी एक जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र ही व्यक्ती कोल्हापुरातील नाहीये. मुंबईहून कर्नाटककडे जात असलेल्या कंटेनरमधून प्रवास करत असलेल्या ३० जणांना १७ एप्रिल रोजी प्रशासनाने ताब्यात घेतले होते. त्यामधील एकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता सात झाली आहे. कोल्हापुरातील पहिल्या दोन कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असताना आज आणखी एका रुग्ण आढळून आल्याने प्रशासन आणखीनच सतर्क झाले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात दुचाकीवरुन दोघांना बंदी ; चारचाकीमधून दोघांचाच प्रवास : जिल्हाधिकारी दौलत देसाई

 
कोल्हापूर (प्रतिनिधी)  : 

संचारबंदीच्या कालावधीत सामाजिक अंतर राखण्यासाठी दुचाकीवरुन दोघांना फिरण्यास बंदी आहे. चारचाकीमधूनही चालवणारी एक व्यक्ती आणि पाठीमागे एक अशा दोघांनीच प्रवास करावा. याचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिला.

जिल्ह्यामध्ये आज एक नवीन रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील नसून मुंबईमधील सांताक्रूझ येथील रहिवाशी आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले,  दि. 16 एप्रिल रोजी एका मोठ्या कंटेनरमधून जवळपास 30 लोकं बेकायदेशीररित्या मुंबईहून कर्नाटककडे चालले होते. त्यांना किणी टोलनाक्याजवळ पोलीसांनी अडवून सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते.  आज कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला रुग्ण हा यामधील आहे. बाकीचे 10 अहवाल हे निगेटिव्ह असून यातील अद्यापही 18 जणांचा अहवाल येणे बाकी आहे. या सर्व व्यक्ती कर्नाटकमधील हसन आणि त्या परिसरातील आहेत.
            
बेकायदेशीर प्रवास करत असताना या सर्वांना अडवलं त्यामुळे कर्नाटकात होणारा संसर्ग थांबवला आहे. तपासणी न करता हे सर्वजण कर्नाटकात गेले असते तर मोठा प्रसार झाला असता. तो जिल्हा प्रशासनाने थांबवला आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, राज्य शासनाने  उद्यापासून उद्योगधंदे, व्यवसाय तसेच कार्यालये काही प्रमाणात सुरु करण्याबाबत निर्देश दिले आहेत. याबाबत जिल्हा प्रशासन स्वतंत्रपणे निर्णय घेत आहे. कोणत्या अधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यायची, किती कामगारांची, किती कार्यालयातील कर्मचाऱ्यांना परवानगी द्यायची याबाबत आज सायंकाळपर्यंत सविस्तर धोरण जाहीर करण्यात येईल.
           
 मंत्रालय तसेच इतर शासकीय कार्यालयामधील काही कर्मचारी आप आपल्या गावामध्ये आले आहेत. अशा कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या मूळ कार्यालयात हजर व्हायचे असेल तर त्याची परवानगीही संबंधित तहसिलदार कार्यालयाकडून मिळेल. संचारबंदीमध्ये अत्यावश्यक तसेच जीवनावश्यक बाबींसाठी नजिकच्या ठिकाणी जाण्यासाठी दुचाकी तसेच चारचाकीमधील प्रवासाला सूट देण्यात आली आहे. परंतु असे निदर्शनास येत आहे, दुचाकीवर चालवणारा आणि त्याच्या पाठीमागे दुसरी व्यक्ती आढळून येत आहे.   राज्य शासनाच्या सूचनेनसुार अशा दुचाकीवर दोघांना प्रवास करण्यास पूर्णत: बंदी घातली आहे.  अत्यावश्यक कारणाने चारचाकीचा वापर करताना चालवणारी व्यक्ती आणि पाठीमागील सीटवर बसणारी एक व्यक्ती अशा दोनच व्यक्ती बसून चारचाकी वापरु शकतात. याचं उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे पोलीसांना देण्यात आले आहेत.

Wednesday, April 1, 2020

पुणे विभागातील शासकीय धान्य गोदामात 19 हजार 975 मेट्रिक टन धान्यसाठा उपलब्ध; विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची माहिती

पुणे विभागातील शासकीय धान्य गोदामात 19 हजार 975 मेट्रिक टन धान्यसाठा उपलब्ध; विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची माहिती


पुणे (प्रतिनिधी) :  पुणे विभागातील शासकीय धान्य गोदामात 19 हजार 975 मेट्रिक टन धान्यसाठा उपलब्ध आहे.  मार्केट मध्ये विभागात 9 हजार 330 क्विंटल अन्नधान्याची तर 18 हजार 330 क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिली.
      पुणे जिल्ह्यात 4 हजार 473 मेट्रिक टन धान्यसाठा, सातारा जिल्ह्यात 4 हजार 88 मेट्रिक टन, सोलापूर जिल्ह्यात 3 हजार 354 मेट्रिक टन, सांगली जिल्ह्यात 5 हजार 463 मेट्रिक टन, कोल्हापूर जिल्ह्यात 2 हजार 582 मेट्रिक टन धान्यसाठयाची आवक झाली आहे.  विभागात 18 हजार 330 क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली आहे. यात पुणे जिल्ह्यात 12 हजार 458 क्विंटल भाजीपाला, सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 315 क्विंटल, कोल्हापूर जिल्ह्यात 1हजार 204 क्विंटल, सांगली जिल्ह्यात 1 हजार 848 क्विंटल, सातारा जिल्ह्यात 1 हजार 505 क्विंटल भाजीपाला आवक करण्यात आला आहे. विभागात 3 हजार 842 क्विंटल फळांची  तसेच 11 हजार 122 क्विंटल कांदा- बटाट्याची आवक झाली आहे.  विभागात 18 हजार 535 क्विंटल अन्नधान्य मार्केटमध्ये उपलब्ध आहे.  विभागात 89.14 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.32 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले असून उर्वरित दूध सुट्ट्या स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली.

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...