Monday, September 28, 2020

"ओबीसी आरक्षण परिसंवादातून" सकल विश्वकर्मीय बलुतेदार समाज एकवटला


नांदेड (प्रतिनिधी) :

ओबीसी घटकातील बलुतेदारांचे आरक्षण व आव्हाने या विषयावर राज्यस्तरीय सकल विश्वकर्मीय सुतार समाज प्रतिनिधी व संघटकांनी ओबीसी चळवळीतील संघटनासह डिजिटल माध्यमातून आरक्षण परिसंवाद आयोजित केला होता. सामाजिक विकास व राजकीय प्रतिनिधित्वापासून वंचित असलेल्या ओबीसी समूहातील गावगाड्यातील बलुतेदार समाजाच्या विकासासाठी शासकीय धोरण राबविण्यासाठी ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणात हस्तक्षेप होऊ नये व लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींना आरक्षण मिळावे या विषयावर प्रमुख वक्त्यांनी आपले विचार मांडले.
बैठकीस प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिनजी राजुरकर, ओबीसी विचारवंत प्रतापरावजी गुरव यांनी मार्गदर्शन केले. बलुतेदार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांतजी गवळी यांनी सारथी, बार्टीच्या धर्तीवर महाज्योतीसाठी शासनाने घोषित केलेला निधी द्यावा व जेणेकरून बलुतेदार घटकांची शैक्षणिक व सामाजिक प्रगती साधता येईल या विषयावर आपले विचार व्यक्त केले. सामाजिक चळवळीतील साहित्यिक बाबा विश्वकर्मा यांनी समर्पक सूत्र संचालनातून महाराष्ट्रातील सर्व समाज प्रतिनिधींचा संवाद घडविला.

राज्यस्तरावरील आयोजित या परिसंवादात विश्वकर्मामय सुतार समाज महासंघाचे जेष्ठ नेतृत्व प्रदीपजी जानवे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वयक सर्वश्री दिलीपरावजी अकोटकर अमरावती, चंद्रकांतजी कांडेकरी (कोल्हापूर), प्रा. विजय रायमल (बुलढाणा), कैलाशजी मोरे (नाशिक), अशोकजी पगार (औरंगाबाद), अर्जुनजी सुतार (इचलकरंजी), शिवरामजी पांचाळ (नांदेड), सतीशजी शिंदे (बुलढाणा), संदीपजी दीक्षित (सातारा), श्रावणजी जाधव (पुणे), परागजी अहिरे (धुळे), विजयजी गवळी (धुळे) यांनी उपस्थित तालुका-जिल्हा प्रतिनिधीना ओबीसी चळवळीतील सहभाग व यापुढील दिशादर्शक कृतीसाठी सामाजिक विचारमंथन केले. सदरील बैठकीस राज्य समितीचे संघटक सतीशजी शिंदे यांनी पुढील निर्णायक कृतीसाठी लवकरच पुढील समिती बैठकीचे निर्देशन केले. परिसंवादाची प्रस्तावना बलुतेदार क्रांतीचे संयोजक अॅड. बाळासाहेब सुतार यांनी केले. सत्यप्रकाश अढवळकर यांनी परिसंवादात राज्य भरातून सहभागी मान्यवर, समाज बांधव व सामाजिक संस्था, संघटना प्रतिनिधींचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप केला.

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....
9049969625

Wednesday, September 23, 2020

मराठा आरक्षणासाठी १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक


कोल्हापूर (प्रतिनिधी) : 

मराठा आरक्षणासाठी 10 ऑक्‍टोबरला महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय बुधवारी कोल्हापूर शहरातील गोलमेज परिषदेत घेण्यात आला. मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं अशा घोषणा देत मराठा समाजाला आरक्षण मिळणारच असा निर्धार हात उंचावून व्यक्त केला. मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवून समाजाला पूर्ववत आरक्षण मिळावे, समाजातील विद्यार्थी व विद्यार्थीनींच्या चालू शैक्षणिक वर्षातील फीचा परतावा शासनाकडून मिळावा, केंद्र सरकारच्या आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या आरक्षणाचा लाभ समाजाला मिळावा, यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढावा, आदी पंधरा ठराव आज येथील राज्यव्यापी मराठा आरक्षण परिषदेत मंजूर झाले. 

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....
9049969625

Tuesday, September 22, 2020

मराठा आरक्षणाबाबत शासनाने पुनर्याचिका दाखल करण्याची सुशील पाटील कौलवकर यांची मागणी


राधानगरी (प्रतिनिधी) :

 उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीमुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने योग्य पुनर्याचिका दाखल करून मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे.यासाठी राज्य व केंद्र शासनाने प्रयत्न करावेत. या मागणीचे निवेदन मराठा समाजाच्या वतीने सुशील पाटील कौलवकर यांनी राधानगरी तहसीलदारांना दिले.

 दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या साठ वर्षांपासून मराठा समाजावर अन्याय झाला असून गुणवत्ता असूनही मराठा तरुणांना नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. सकल मराठा समाजास नोकरीत आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी लाखोंचे मोर्चे काढून जोरदार मागणी केली. न्यायालयीन लढाईत मागील सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी योग्य बाजू मांडली नसल्यामुळे समाजाला न्यायालयीन प्रक्रियेचा मोठा फटका बसला आहे. शासनाने या निर्णयाविरोधात पुनर्याचिका दाखल करून न्याय द्यावा. आरक्षणाचा निर्णय लागेपर्यंत सर्व नोकर भरती बंद करावी. विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करावी. नोकरीत आरक्षण मिळावे. कोल्हापूर जिल्ह्यात मराठा भवन बांधावे. आदी मागण्या निवेदनात नमूद केले आहेत.
       
 यावेळी प्रा.विश्वास पाटील, प्रा.वसंत ढेरे, आर.के.पाटील, प्रा.नितीन जरंडीकर, संदीप पाटील, दिनकर चौगले, पंकज पाटील, मानसिंग पाटील आदी उपस्थित होते.

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....
9049969625

Friday, September 18, 2020

शैलेश बलकवडे कोल्हापूरचे नवीन पोलिस अधीक्षक

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) :

 राज्यातील पोलिस दलात मोठे बदल करण्यात आले आहेत. गडचिरोलीचे विद्यमान पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे  कोल्हापूरचे नवीन पोलिस अधीक्षक असतील. कोल्हापूरचे विद्यमान पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी वर्णी लागली आहे. अनेक जिल्ह्यातील पोलिस अधीक्षकांच्या बदली करण्यात आल्या आहेत.

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....
9049969625

Thursday, September 17, 2020

मुंबईत रात्रीपासून १४४ कलम लागू


मुंबई (प्रतिनिधी) :

करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही नियंत्रणात नसल्याने मुंबई पोलिसांकडून पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज गुरुवारी मध्यरात्रीपासून याची अमलबजावणी होणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत १४४ कलम लागू राहणार आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी एक किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र दिसल्यास मुंबई पोलीस त्यांच्यावर कारवाई करतील. मुंबई पोलिसांची ही ऑर्डर नित्यक्रमाचा भाग असून अनलॉक गाइडलाइन्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आधीच्या आदेशात सूट देण्यात आलेल्या सर्व गोष्टी सुरु राहणार आहेत.

पोलीस उपायुक्तांकडून त्याबाबतचे आदेश जारी केले आहेत. राज्य सरकारने ३१ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसारच संचारबंदी लागू करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे. सोबतच मुंबईत कोणतेही नवे निर्बंध लागू करण्यात आले नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. ही ऑर्डर दर १५ दिवसांनी होणाऱ्या मुंबई पोलिसांच्या नित्यक्रमाचा भाग असून नवीन लॉकडाउन असल्याचा गैरसमज केला जाऊ नये असं आदेशात सांगण्यात आलं आहे.

कोल्हापूर शिवाजी पेठेतील ऑरेंज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोविड उपचार केंद्र सुरु


कोल्हापूर (प्रतिनिधी) : 

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शहरातील शिवाजी पेठ या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ऑरेंज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुसज्ज कोविड उपचार केंद्र सुरु केले आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारादरम्यान वैद्यकीय सेवेतील गेल्या ५-६ महिन्यात अनुभवास आलेल्या त्रुटी दूर करून हे कोविड उपचार केंद्र सुरु केले आहे.
ऑरेंज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे  अत्याधुनिक सुविधा आणि दर्जेदार वैद्यकीय सेवेसाठी प्रसिद्ध आहे. कोरोनावरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या आदर्श उपचार पद्धतीची काटेकोर पणे अमलबजावणी याठिकाणी केली जाते. त्याकरिता  सुसज्ज ICU वॉर्ड, ऑक्सिजन बेड ची उपलब्धता,  २४ तास डॉक्टर आणि आपुलकीने वागणारा नर्सिंग स्टाफ, पोषक आहार, रुग्ण आणि कुटुंबियांचे समुपदेशन यांसह इतर सेवांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी ८४५९३९०५२३ किंवा ९८९०६०८२६५ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाने केले आहे.

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....
9049969625

Wednesday, September 16, 2020

करोना संकटात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती


मुंबई (प्रतिनिधी) :

करोना संकटामुळे अर्थव्यवस्था कोलमडली असून बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान ठाकरे सरकारने राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून यानिमित्ताने राज्यातील तरुण-तरुणींना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी पार पडली असून या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाने महाराष्ट्रात १२ हजार ५०० पदांसाठी पोलीस भरती कऱण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासात इतकी मोठी भरती होणार आहे. पोलीस भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु केली जाणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागातील तरुण आणि तरुणांनी पोलीस खात्यात भरती होण्याची संधी मिळणार आहे. करोनामुळे एकीकडे अर्थव्यवस्था कोलमडली असताना नोकरीच्या संधी कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने घेतलेला हा निर्णय नोकरीची संधी शोधणाऱ्या राज्यातील तरुण-तरुणींना दिलासा देणारा आहे.

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....
9049969625

Tuesday, September 15, 2020

रस्ता दुरुस्ती प्रश्नी पेरणोलीत युवकांचे चिखलात बसून उपोषण


आजरा (प्रतिनिधी) :

पेरणोली (ता. आजरा) येथील विठ्ठल मंदिरकडे जाणार्‍या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीला निवेदन देऊनही या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. याचा निषेध म्हणून गावातील युवकांनी रस्त्यावर निर्माण झालेल्या चिखलात बसून उपोषण केले. या अनोख्या आंदोलनाची चर्चा पंचक्रोशीत होत आहे. आगामी काळात रस्ता दुरुस्त न झाल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकून आत्मदहन करण्याचा इशारा वाघाचा चौक मंडळाचे अध्यक्ष संकेत सांवत यांनी दिला आहे. यावेळी दिनेश कांबळे, पांडूरंग पाईम, हरिबा कांबळे उपस्थित होते.

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....
9049969625

Monday, September 14, 2020

'संत गजानन' मध्ये ‘नीट’ परीक्षा नेटकी


महागाव (प्रतिनिधी) :

महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज पॉलिटेक्निक व बी. टेक केंद्रांवर राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट) सुरळीत पार पडली. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. पहिल्यांदाच या विभागात राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा झाली. 

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय प्रवेश परीक्षा (नीट) महाराष्ट्रात परीक्षा 615 केंद्रावर रविवार (दि. 13) रोजी घेण्यात आली. महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाच्या या  केंद्रावर 900 विद्यार्थाची सोय करण्यात आली होती.  त्यापैकी 700 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. कोणत्याही अडचणीविणा या  केंद्रांवर परीक्षा सुरळीत झाली.


करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या व नँशनल टेस्टींग एजन्सीच्या नियम व आदेशानुसार या परीक्षा केंद्रावर प्रत्येक विद्यार्थाची पुरेपुर काळजी घेण्यात येत होती. अंतरनियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्याबरोबर परीक्षा संपल्यानंतर गेटपर्यत सोडण्यात आले. त्याआधी विद्यार्थ्यांची थर्मल स्किनिंगने तपासणी करण्यात आली.  एखाद्या विद्यार्थ्यांला अगदी काही मिनिटे उशीर झाल्यास त्यांना केंद्रावरील कर्मचारी सहकार्य करत होते. गाड्याच्या पार्किगंसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. परिक्षेत गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलिस व खाजगी सिक्युरिटी गार्डना तैनात करण्यात आला होता. प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत यांच्या नियंत्रणाखाली परिक्षा सुरळीत पार पडली. याकामी प्रा. संतोष पोवार, प्रा.अमित देवकर, सचिन माटले, प्रा.राहूल देसाई, प्रा.अमरसिंह फराकटे, प्रा.शिवलिंग स्वामी, प्रा.विनायक घाटगे, मल्लीकार्जुन पाटील, प्रा.सुप्रिया राजाराम, प्रा.अमोल माने व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. एन.टी.ए.चे समन्वयक प्रा.कविता कुलकर्णी यांनी उत्कुष्ट परिक्षेच्या कामकाजाबद्दल विशेष कौतुक केले.

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब...
9049969625

Friday, September 11, 2020

महागावातील चव्हाण कुटुंबीयाना अविष्कार फौंडेशनचा "कोविड -19 समाजरक्षक" पुरस्कार


महागाव (प्रतिनिधी) :

महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलचे डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. प्रतिभा चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण या चव्हाण कुटुंबातील सदस्यांना अविष्कार फाउंडेशन, कोल्हापूर याच्यां वतीने "कोविड -19 समाजरक्षक" या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आला. या फाउंडेशनच्या वतीने देशभरातील 1200 हून अधिक कोरोना योद्धांचा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. ग्रामिण भागातील सामान्य व गरीब रुग्णांना आधारवड ठरणारे या हॉस्पिटलने कोविड -19 च्या पार्श्वभुमीवर गरीब रुग्णांच्या उपचारासाठी पुढे येऊन अविरतपणे रुग्णांची सेवा केली. या त्याच्या कार्याची दखल घेत अविष्कार फाउंडेशनच्या वतीने समाजरक्षक कोविड योद्धा पुरस्काराने गौरवण्यात आले. हॉस्पिटलला यापुर्वी एन. ए. बी. एच. मानाकंन,  स्कोच व सकाळ एक्सलन्स पुरस्कार मिळाला आहे. या महामारीच्या काळात समाजातील गरीब व वंचित रुग्णांना मदतीचा हात दिल्याबद्दल महागाव पंचक्रोशित चव्हाण कुटुंबीयाच्या कार्याचा गौरव होत आहे.

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....
9049969625

संत गजानन शिक्षण समूह महागावमध्ये नीट परिक्षेसाठी बैठक व्यवस्था

 
महागाव (प्रतिनिधी) :

महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज शिक्षण समुहातील पॉलिटेक्निक व बी. टेक. महाविद्यालयात वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नॅशनल एलिजिबिटी कम एन्ट्रांस टेस्ट (Neet) परिक्षेसाठी या केंद्रामध्ये विद्यार्थाची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. रविवार (दि. 13 सप्टेंबर ) रोजी होणाऱ्या या परिक्षेसाठी 75 कक्षातून 900 विद्यार्थी उपस्थित राहणार आहे. शासनाच्या व नॅशनल टेस्टींग एजन्सीच्या आदेशानुसार कोवीड -19 च्या 
पार्श्वभुमीवर विद्यार्थाच्या सुरक्षित वावर राखण्याबरोबरच सर्व ती  खबरदारी घेण्यात आली आहे तसेच परिक्षेची सर्व तयारी झाली  असल्याची माहिती प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत यानी दिली आहे.

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....
9049969625

Tuesday, September 8, 2020

कोल्हापूर शहरात जनता कर्फ्यु लागू होण्याची शक्यता; व्यापार्‍यांचा पुढाकार, आज बैठक


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

 कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात लॉकडाऊन व जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. कोरोनाचा समूह संसर्ग टाळण्यासाठी आता तालुक्‍यापाठोपाठ कोल्हापूर शहरातही जनता कर्फ्यु व्हावा यासाठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या नेतृत्त्वाखाली व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.  यासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्यासाठी आज (दि. 8) सायंकाळी इंजिनिअरींग असोशिएनच्या बैठकीत व्यापारी असोशिएशनची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत गुरुवार (दि. १०) पासून जनता कर्फ्यू पाळण्याबाबत एकमत होण्याची शक्यता आहे. किमान सात ते आठ दिवसाचा जनता कर्फ्यू असण्याची शक्यता आहे.


बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....
9049969625

Monday, September 7, 2020

गारगोटी शहरात १४ दिवसांचा लॉकडाऊन


गारगोटी (प्रतिनिधी) :

भुदरगड तालुक्यात कोरोनामीटर वाढतच आहे. स्थानिकांनामध्ये कोरोनाचा समूह संसर्ग होत आहे. यामुळे कोरोनाची साखळी तोडण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी गारगोटी शहर १४ दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय ग्रामपंचायत व व्यापार्‍यांनी घेतला आहे. यानुसार गारगोटी शहर बुधवार (दि. ९) ते मंगळवार (दि. २२) पर्यंत लॉकडाऊन करण्यात येणार आहे.

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....
9049969625

Sunday, September 6, 2020

संत गजानन आयुर्वेद महाविद्यालयात ऑनलाईन शिक्षक दिन; विद्यार्थानी घरी बसूनच राबवला डीजीटल उपक्रम


महागाव (प्रतिनिधी) :

 महागाव (ता.गडहिंग्लज ) येथील संत गजानन आयुर्वेद महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंतीनिमित्य ऑनलाईन शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यासाठी उस्फूर्त  प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर प्रथमच विद्यार्थानी घरी बसून राबवलेल्या या डिजीटल उपक्रमाचा सर्वत्र कौतुक होत आहे.

 स्वागत श्वेता येडवे यानी केले. प्रास्ताविक प्राचार्या डॉ. मंगल मोरबाळे यांनी केले. या उपक्रमाचा कौतुक करुन डॉ. राधाकृष्णन यांना अभिवादन करीत त्यांच्या शैक्षणिक कार्याची माहिती सांगितले. यावेळी पुष्पाजंली हांडे, संकेत कुंभार, सोनाली गाडे, समिर शहा, सायली मिठारी या विद्यार्थानी मनोगत व्यक्त करुन शिक्षकाविषयी आदर व्यक्त केला. यावेळी सर्वच शिक्षकांनी विद्यार्थाना शिक्षक दिनाचे महत्त्व पटकावुन दिले. महाविद्यालयाच्या आरंभ बॅचच्या विद्यार्थानी राबवलेल्या या कार्यक्रमाला 150 हून अधिक विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून लाभ घेतला. आभार अनुराधा स्वामी यांनी मानले.

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....
9049969625

Saturday, September 5, 2020

जि. प. सदस्या रेश्मा देसाई यांच्या मार्फत शेतीउपयोगी साहित्याचे वाटप


गारगोटी (प्रतिनिधी) :

गारगोटी येथील जिल्हा परिषद सदस्या रेश्मा राहूल             देसाई यांच्या मार्फत शेती उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये औषध फवारणी पंप, कडबाकुट्टी मशिन, खोरे, पार, टिकाव, पाटी, ताटपत्री, शिलाई मशिन साहित्य युवक नेते राहुल बजरंग देसाई व जिल्हा परिषद सदस्या रेश्मा राहुल देसाई यांच्या हस्ते  राहुल देसाई यांच्या गारगोटीतील संपर्क कार्यालयात वाटप करण्यात आले. या वेळी गारगोटीचे सरपंच संदेश भोपळे,शिवराज देसाई, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वास्कर, बजरंग कुरळे, जीतु भाट, सचिन देसाई, सतिश सावंत, एम. एम. कांबळे, दतात्रय कांबळे, अशोक भावकर, सुभाष थोरबोले, संदिप मांगले, सागर परिट, दिगंबर गायकवाड, किसन इंदुलकर, सदाम बागवान, अशोक सुतार, विष्णु ताम्हणकर, रवि जाधव, विनायक परिट, सुहास कांबळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

बातम्या व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....
9049969625

गडहिंग्लज तालुका दहा दिवस लॉकडाऊन


गडहिंग्लज (प्रतिनिधी) :

गडहिंग्लज तालुक्यात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. स्थानिक रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. समूह संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे कोरोनाची साखळी तोडण्याकरिता गडहिंग्लज शहरासह तालुका लॉकडाऊन करण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. यामुळे गडहिंग्लज तालुक्यात सोमवार (दि. ७) ते बुधवार (दि. १६) पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तालुक्यात बंदची नागरिकांनी मागणी केली होती.

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....
9049969625

Friday, September 4, 2020

सावधान; आजरा तालुक्यात विनामास्क फिरल्यास होणार इतक्या हजाराचा दंड


आजरा (प्रतिनिधी) :

आजरा तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या पाचशेकडे वाटचाल करित आहे. यामुळे प्रशासनासह नागरिकांच्याही चिंतेत वाढ होत आहे. यामुळेच प्रशासनाने आजरा तालुक्यात विनामास्क फिरणार्‍यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. तालुक्यात विनामास्क फिरणार्‍या व्यक्तीला पाच हजार रुपयांचा दंड किंवा दंड न भरल्यास पोलीस कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत सर्व ग्रामसमित्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. याची अंमलबजावणी सोमवार (दि. ७) पासून करण्यात येणार आहे. 

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....
9049969625

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...