अभिषेक डोंगळे यांच्यामुळे वाचले ६१ बकरींचे प्राण
कोल्हापूर वृत्तसेवा :
घोटवडे(ता. राधानगरी) येथे आलेल्या बकरींच्या कळपातील काही बकऱ्या अचानक आजारी होऊन तडफडू लागल्या. या बकऱ्यांची जीवन-मरनाशी संघर्ष सुरु होता. ही गोष्ट राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस युवा नेते अभिषेक डोंगळे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत बकरीवर उपचाराची व्यवस्था करून दिली. त्यांच्या प्रसंगावधाणामुळे सुमारे ६१ बकरीचे प्राण वाचण्यास मदत झाली. त्यामुळं अभिषेक डोंगळे यांच्या कृतीचे सर्वत्र कौतुक होतं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, घोटवडे (ता.राधानगरी) येथे कर्नाटक राज्यातील कुर्ली (ता.चिक्कोडी) येथील धनगर समाजातील सिद्धू हेरवाडे व बेरू हेरवाडे हे सुमारे ४५० बकऱ्यांचा कळप घेऊन आले होते. सायंकाळी सात नंतर डोंगर, शेत रानातून दिवसभर चरून सदरचे मेंढपाळ घोटवडे गावातील माळवाडी शेतीमध्ये तळावरती बकरी घेवून जाताना अचानक काही बकऱ्यांचे पोट गच्च होऊन अंग ताठ होऊन वाटेत पडू लागली हि परिस्थिती पाहून धनगर हेरवाडे घाबरून रडू लागले. बकऱ्यांच्या कळपातील जवळपास ७५ बकऱ्यांना विषबाधा झाली. ही गोष्ट समजताच गावातील लोक जमू लागले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस युवा नेते अभिषेक डोंगळे यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांना याबाबत माहिती दिली. गोकुळचे पशुवैद्यकीय अधिकारी, कोल्हापूर जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक कृत्रिम रेतनसेवक यांची तात्काळ मदत अभिषेक डोंगळे यांनी मागवून घेऊन बाधित बकऱ्यांना आवश्यक तो औषधोपचार केल्याने पुढील मोठी दुर्घटना टळली. बाधित ७५ पैकी १४ बकरी विषबाधेने मयत झाली. बाधित बकऱ्यांच्या औषध उपचारावरील सर्व खर्च अभिषेक डोंगळे यांनी स्व:खर्चातून करून हेरवाडे कुटुंबीयांना आधार देण्याचे काम केले. यावेळी बाधित बकऱ्यांच्या वरती जिल्हा परिषद पशुवैद्यकिय अधिकारी गोविंद कटरे, गोकुळ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बारवे, डॉ. एस.के.पाटील यांनी उपचार केले. तत्पूर्वी स्थानिक कृत्रिम रेतनसेवक संजय डोंगळे, विक्रम कुलकर्णी, पवन गुरव यांनी प्राथमिक औषधोपचार केले. यावेळी घोटवडे सरपंच धिरज डोंगळे, संजय डोंगळे, युवाशक्ती अध्यक्ष सुहास डोंगळे व सर्व पदाधिकारी तसेच युवक, ग्रामस्थ उपस्थितीत होते.
---- ----- -----
No comments:
Post a Comment