Monday, April 26, 2021

आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्रातील भाविकांचे दैवत : दख्खनचा राजा जोतीबा; चैत्र यात्रा विशेष


विकास न्यूज (विशेष प्रतिनिधी) :

आंध्र प्रदेश असो वा मध्यप्रदेश असो वा कानडी मुलुख असो इथला भाविक जोतीबाची चैत्र यात्रा चुकवत नाही. भौगोलिक दृष्ट्या हे भाग वेगवेगळे राज्य असली तरी तमाम मराठी भाविक मंडळी ही याना त्या कारणाने स्थलांतरित झालेली आहेत. हे स्थलांतर पेशवाई काळात फार झाले आहे. लढाई च्या निमित्ताने  काही मराठी मंडळी तेथेच राहिली पण त्यांनी आपल्या कुलदैवताचा विसर पडु दिलेला नाही.

आम्ही इकडे उत्तरेकडे मोठी मुलूखगिरी करण्यास आलो असून मोठी दौलत मिळवली आहे हे खरे आहे, तथापि आमचे कुलदैवत डोंगराचा जोतिबा, छत्रपतींचा भगवा झेंडा व आमची मूळची शिंदखेडची पाटीलकी यांचे विस्मरणाने रहाणारी दौलत आम्ही कस्पटासमान मानतो. हे उद्गार आहेत, ग्वालेरच्या महादजी शिंदे यांचे.
शिंदे घराण्याची ज्योतिबावर खूप मोठी श्रद्धा. शिंदे घराण्याचे कुलदैवत म्हणजे जोतिबा. शिवाजीराव शिंदे यांच्या काळात ग्वाल्हेर व इतर संस्थानांचे एकत्रिकरण होवून मध्यप्रदेशची निर्मिती होणार होती. तेव्हा शिंदे यांनी आपला अधिकारी जोतिबा डोंगरावर पाठवला. एकिकरणासंदर्भात जोतिबाचा प्रसाद घेतला आणि नाथांची एकीकरणासंदर्भात आज्ञा आहे असा कौल घेवूनच परतले. त्यानंतर ग्वाल्हेर संस्थान मध्यप्रदेशात सहभागी होण्याच्या हालचाली सुरू झाल्या.

जोतिबाचे आज जे देवालय आहे ते ग्वालेरच्या राणोजीराव शिंदे यांनी १७३० साली बांधले. तिथेच असणारे केदारेश्वराचे मंदीर दौलतराव शिंदे यांनी बांधले. चोपडाईचे मंदिर प्रितीराव चव्हाण यांनी बांधले तर मालोजी निकम पन्हाळकर यांनी रामेश्वराचे मंदीर बांधले. जोतिबाचे मंदीर पुर्वी छोटे होते. राणोजीराजे शिंदे यांच्या पुढाकारातून आजचे मंदीर बांधण्यात आले. जोतिबा डोंगरावर कसा आला. या गडाला जोतिबाचा डोंगर, वाडी रत्नागिरी हे नाव कस पडलं याबाबतीत देखील आख्यायिका सांगितल्या जातात. 

🌀जोतिबाची आख्यायिका🌀

रत्नासुर नावाचा राक्षस होता. त्याने देवांना युद्धाचे आव्हान दिले. जोतिबाने ते आव्हान स्वीकारले आणि युद्धाला सुरवात झाली. हे युद्ध आषाढी अमावस्येला सुरू झाले आणि श्रावण शुद्ध षष्ठीस रत्नासुर जमिनीवर कोसळला. रत्नासुर जमिनीवर पडला तेव्हा सर्व जनतेने चांगभल अशा आरोळ्या ठोकल्या. अखेर रत्नासुरावरूनच या ठिकाणाला वाडी रत्नागिरी अस नाव देण्यात आलं. गंमत म्हणजे रत्नासुराचा वध झाल्यानंतर त्यांच्या सोबत असणाऱ्या इतर राक्षसाचा वध करण्यास जोतिबाने सुरवात केली. जो राक्षस ज्या ठिकाणी मेला त्या ठिकाणाला त्या त्या राक्षसावरुन नाव देण्यात आले. दानासूर दानोळीत, कोथळासूर कोथळीत, केसी केसापूरात, कुंभासूर कुंभोजमध्ये, महिषासुर मसाई पठारावर, संदळ- मंजळ हे राक्षस सादळे-मादळेत, कंदासूर कांदेमध्ये, मंगलासुर मांगले गावात मरून पडले. त्या राक्षसांच्या नावावरूनच या गावांची नावे देण्यात आली. जोतिबाने रत्नासुराचा टोप जिथे पाडला त्या गावाला टोप. रत्नासुराचा मंडप जिथे पडला ते मनपाडळे अशी आख्यायिका देखील सांगितली जाते. 

जोतिबाची यात्रा

चैत्री पोर्णिमेला जोतिबाची यात्रा भरते. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेशसह देशभरातून मराठी बांधव या जत्रेत सहभागी होतात. सासनकाठ्यांचा मान असणारे भाविक सासनकाठ्या नाचवत जल्लोष करतात. जोतिबाच्या नावाने चांगभल म्हणत सारा डोंगर गुलालात उधळून निघतो. सासनकाठ्या विजयीपताका म्हणून मिरवण्यात येतात. पालखी यमाई मंदीरात भेट घेवून पुन्हा येईपर्यन्त ३५ ते ४० फूट उंच असणारी सासनकाठी एकटा माणूस नाचवत राहतो. सासनकाठी म्हणजे ३५-४० फुटांचा लांबलचक वेळू. त्याच्या शेंड्याला एक वस्त्र व तूरा बांधलेला असतो व त्यावर एक फळी असते. सासनकाठीच्या बुडक्यापासून चार फुटावर एक आडवी लाकडी फळी माश्याच्या आकाराची बसवली जाते ज्याच्यावर श्री नाथांची मुर्ती किंवा पादुका बसवतात व त्याच्या सहाय्याने सासनकाठी खांद्यावर घेवून नाचवता येते. सासनकाठीला चारी बाजूने दोऱ्या बाधलेल्या असतात. त्याला तोरणी असे म्हणले जाते.सासनकाठीला मानाचे नारळाचे तोरण चढवले जाते. काही गावात लहान मुलांना सासनकाठीच्या पायावर घातले जाते. महाराष्ट्रासह इतर राज्यातून मानाच्या ९६ तर इतर २५० च्या वर सासनकाठ्या चैत्रयात्रेला सहभागी होतात. सोबत दवण्याचा सुगंध गुलाल-खोबऱ्याची उधळणं असते. चांगभल गजराबद्दल अभ्यासक सांगतात की हा शब्द पंजाबी चंगा भला यापासून आलेला आहे. चांगल होवो म्हणजेच चांगभलं.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....

Saturday, April 24, 2021

चिंताजनक; आजरा तालुक्यात दिवसभरात ६१ नवे रुग्ण, एक मयत


आजरा (प्रतिनिधी) :

आजरा तालुक्यात कोरोनाचा विस्फोट सुरुच आहे. शनिवारी दिवसभरात ६१ जणांचा कोरोनाचा अहवाल पाॅझीटीव्ह आला आहे. मुमेवाडी येथील ६४ वर्षीय स्त्रीचा कोल्हापूर येथे कोरोनाने मृत्यू झाला अ‍हे.  आज दिवसभरात उत्तूर १३, चव्हाणवाडी ५, महागोंड ५, महागोंडवाडी १, किणे ३, कानोली १, मेंढोली १,  मडिलगे ३२ असे एकूण ४७ जण पाॅझीटीव्ह आढळले आहेत. या रुग्णांमध्ये २९ पुरुष तर ३२ स्त्रीयांचा समावेश आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....

Friday, April 23, 2021

चिंताजनक; आजरा तालुक्यात दिवसभरात ४७ नवे रुग्ण, तीघांचा मृत्यू


आजरा (प्रतिनिधी) :

आजरा तालुक्यात कोरोनाचा विस्फोट सुरुच आहे. शुक्रवारी दिवसभरात ४७ जणांचा कोरोनाचा अहवाल पाॅझीटीव्ह आला आहे. ३ जणांचा मृत्यू झाला आहे.  भादवण मधील २६ वर्षीय पुरुष, उत्तूर येथील ५६ वर्षीय स्त्री तर मडिलगे येथील ६४ वर्षीय पुरुषाचा मयत झालेल्यांमध्ये समावेश आहे. आज दिवसभरात आजरा ७, बहिरेवाडी२, महागोंड ११, कर्पेवाडी ४, उत्तूर ५, चव्हाणवाडी २, येमेकोंड २, भादवण ३, मडिलगे४, कोवाडे, पेरणोली, मुरुडे, गणेशवाडी, शेळप, वेळवट्टी, देवर्डे प्रत्येकी १ असे एकूण ४७ जण पाॅझीटीव्ह आढळले आहेत. या रुग्णांमध्ये ३१ पुरुष तर १६ स्त्रीयांचा समावेश आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....

Wednesday, April 21, 2021

धोका वाढला; आजरा तालुक्यात दिवसभरात ३१ नवे रुग्ण


आजरा (प्रतिनिधी) :

आजरा तालूक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. बुधवारी दिवसभरात ३१ नवे कोरोना बाधीत सापडले आहेत. दिवसभरात सापडलेल्या रुग्णांत महागोंड १०, सुळे ७, लाकूडवाडी १, गजरगाव १, पेद्रेवाडी २, पारपोली १, पेरणोली १, उत्तूर २, वाटंगी १, किणे १, सरोळी २, मोरेवाडी २. दिवसभरात आढळलेल्या रुग्णांत २० पुरुष तर ११ स्त्री आहेत. 

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....

Tuesday, April 20, 2021

चिंताजनक; आजरा तालुक्यात दिवसभरात तब्बल ६० नवे कोरोनाचे रुग्ण; तीन मयत


आजरा (प्रतिनिधी) :

आजरा तालुक्याचे कोरोनाचे मीटर दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे तालुकावासियांसह प्रशासनाच्याही चिंतेत वाढ झाली आहे. मंगळवारी दिवसभरात तालुक्यात तब्बल ६० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. विशेष म्हणजे भादवण गावात तब्बल २६ नवे रुग्ण आढळले आहे. त्याचबरोबर तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यां मध्ये महागोंड येथील ५१ वर्षीय पुरुष, लाटगाव येथील ७० वर्षीय पुरुष व ७५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. दिवसभरात आढळलेल्या रुग्णांमध्ये कानोली आठ, कागिणवाडी एक, आवंडी दोन, रवळनाथ कॉलनी आजरा एक, मडिलगे दोन, उत्तूर पाच, मुमेवाडी एक, होन्याळी एक, बेलेवाडी एक, सुळे एक, सरोळी तीन, चव्हाणवाडी चार, देवर्डे माद्याळ चार तर भादवन सव्वीस असे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये २४ पुरुष तर ३६ स्त्रीयांचा समावेश आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....

गोकुळसाठी सत्ताधारी व विरोधी पॅनेलची घोषणा; पहा कुणाकुणाला मिळाली संधी


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) निवडणूकीसाठी सत्ताधारी व विरोधी पॅनेलची घोषणा नेतेमंडळीकडून करण्यात आली आहे. दोन्ही पॅनेलमधून अपेक्षित चेहर्‍यांनाच संधी मिळाली आहे. पॅनेलची घोषणा झाल्यानंतर निवडणूकीला आता निवडणूकीचा ज्वर वाढणार आहे. 

सत्ताधारी पॅनेलचे उमेदवार :
सर्वसाधारण गट - रविंद्र आपटे, रणजित पाटील (मुरगुडकर), दिपक पाटील, धैर्यशील देसाई, बाळासो खाडे, उदय पाटील, अमरिष घाटगे, सत्यजीत पाटील, सदानंद हत्तरकी, चेतन नरके, धनाजी देसाई, प्रकाश चव्हाण, प्रतापसिंह पाटील, राजाराम भाटले, रविश पाटील कौलवकर, रणजीत बाजीराव पाटील
इतर मागास प्रवर्ग - पी. डी. धुंदरे
अनुसुचित जाती जमाती - विलास कांबळे
भटक्या विमुक्त - विश्वास जाधव
महिला प्रतिनिधी - शौमिका महाडिक, अनुराधा पाटील

विरोधी आघाडीचे उमेदवार :
सर्वसाधारण गट - विश्‍वास पाटील (आबाजी), अरुण डोंगळे, शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर, बाबासाहेब श्रीपती चौगले, अजित नरके, नावेद मुश्रीफ, करणसिंह गायकवाड, विरेंद्र मंडलिक, नंदकुमार ढेंगे, अभिजित तायशेटे, प्रकाश रामचंद्र पाटील, रणजित के. पी. पाटील, विद्याधर गुरबे, एस.आर.उर्फ संभाजी रंगराव पाटील, महाबळेश्‍वर शंकर चौगले, किसन बापुसो चौगले.
इतर मागासवर्ग - अमरसिंह यशवंत पाटील.
अनुसुचित जाती जमाती - डॉ.सुजित मिणचेकर,
भटक्‍या विमुक्‍त - बयाजी देवू शेळके
महिला प्रतिनिधी - सुश्‍मिता राजेश पाटील, अंजना रेडेकर

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....

Sunday, April 18, 2021

आजरा तालुक्यात दिवसभरात आठ कोरोनाचे रुग्ण


आजरा (प्रतिनिधी) :

आजरा तालुक्यात रविवारी कोरोनाच्या बाबतीत दिलासा मिळाला आहे. दिवसभरात आठ कोरोनाचे नविन रुग्ण सापडले आहेत. यामध्ये भादवण एक, उत्तूर तीन, पेरणोली एक, आजरा एक, मुमेवाडी दोन रुग्णांचा समावेश आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात १४ दिवस कडक जनता कर्फ्यूचे ग्रामविकासमंत्र्यांचे संकेत


कोल्हापूर (प्रतिनिधी) : 

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात १४ दिवसांचा जनता कर्फ्यू करण्याचे संकेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ दिले आहेत.  येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाबतीत प्रशासन कडक निर्बंधाचे धोरण राबविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच आगामी तीन चार दिवसात जनता कर्फ्यू लागण्याची शक्यता आहे.

यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढू नये यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. तरीही वाढणारी साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूचा एकमेव पर्याय समोर आहे. त्यामुळे चौदा दिवसांचा कडक जनता कर्फ्यू केला जाईल. याचे नियोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....

Saturday, April 17, 2021

आजरा तालुकावासियांच्या चिंतेत वाढ; ४२ नवे कोरोना रुग्ण

आजरा (प्रतिनिधी) :

आजरा तालुक्यात कोरोनामीटर वाढतच आहे. यामुळे तालुकावासियांच्या चिंतेत वाढ होत आहे. शनिवारी दिवसभरात आजरा तालुक्यात तब्बल ४२ नवे कोरोनाचे रुग्ण सापडले. यामध्ये पेरणोलीत तीन, पोश्रातवाडी दोन, मलिग्रे दोन, शेळप एक, लाटगाव पाच, भटवाडी बुरुडे एक, चाफेगल्ली आजरा एक, भादवण तीन, चांदेवाडी एक, पारपोली दोन, श्रृंगारवाडी एक, वेळवट्टी चार, कानोली चार, हरपवडे एक, किटवडे एक, दर्डेवाडी एक, महागोंड दोन, यमेकोंड दोन, आजरा एक, उत्तूर चार असे रुग्ण सापडले आहेत. शनिवारच्या सापडलेल्या रुग्णांत २६ पुरुष तर १६ स्त्रींचा समावेश आहे. यामुळे तालुक्यातील अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या १२१ झाली आहे. 

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....

Friday, April 16, 2021

चिंताजनक आजरा तालुक्यात दिवसभरात कोरोनाचे २३ नवे रुग्ण


आजरा (प्रतिनिधी) :

शुक्रवारी आजरा तालुक्यात कोरोनाचा कहर झाला आहे. एकाच दिवशी २३ नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी  पेरणोलीत एक, भादवनमध्ये दोन, होन्याळीत एक, लाटगावात चार, वाटंगी एक, उत्तूर दोन, सोहाळे दोन, कानोली एक, पोश्रातवाडी दोन, महागोंड दोन, सरोळी दोन, कोवाडे एक तर आजरा शहरात दोन रुग्ण साडले आहेत. शुक्रवारच्या रुग्णांमध्ये १४ पुरुष तर ९ स्त्रिया आहेत. दरम्यान पोश्रातवाडी येथील ६७ वर्षीय पुरुषाचा सीपीआर कोल्हापूर येथे मृत्यू झाला आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....

Tuesday, April 13, 2021

बुधवारी रात्री ८ वाजल्यापासून राज्यात संचारबंदी : मुख्यमंत्री; काय सुरु, काय बंद पहा


मुंबई (प्रतिनिधी) :

महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात सातत्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू होणार की कठोर निर्बंध? या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांत मोठी चर्चा पाहायला मिळाली. महाराष्ट्रात रुग्णसंख्येसोबतच मृतांचा आकडा देखील वाढू लागला आह. त्यासोबतच राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या आरोग्य सुविधांची कमतरता देखील जाणवू लागल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन करायला हवा, असा देखील दावा केला गेला. लॉकडाऊन बाबत सर्वच स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया आल्या. यामध्ये काहींनी लॉकडाऊनचं समर्थन केलं तर काहींनी विरोध केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात सर्वपक्षीय नेते, डॉक्टर, मनोरंजन क्षेत्रातील प्रतिनिधी, तज्ज्ञांशी चर्चा देखील केली. या सर्व चर्चांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज राज्यातल्या जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला.

राज्यात १५ दिवसांसाठी कलम १४४ लागू!

नाईलाजाने आपल्याला काही निर्बंध घालावे लागणार आहेत. चर्चेत आपण बराच वेळ घालवला आहे. आता निर्णय घेण्याचा क्षण आला आहे. आपल्याला रोजीरोटी महत्त्वाची आहेच. पण त्याआधी जीव वाचवणं आवश्यक आहे. सध्या तोच आपल्यासमोरचा महत्त्वाचा मुद्दा आहे. उद्या संध्याकाळी ८ वाजल्यापासून हे निर्बंध लागू होतील. पंढरपूर मंगळवेढ्याचं मतदान आहे. ते झाल्यानंतर तिथे देखील निर्बंध लागू होतील. उद्या संध्याकाळपासून आपण ब्रेक द चेनं लागू करत आहोत. राज्यात १४४ कलम लागू होणार. याचा अर्थ पुढचे किमान १५ दिवस राज्यात संचारबंदी लागू असेल. अनावश्यक प्रवास पूर्णपणे बंद करावा लागेल. योग्य कारण नसेल, तर घराबाहेर पडायचं नाहीये.

लोकल, बससेवा सुरू राहतील

अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा बंद राहतील. सकाळी ७ ते रात्री ८ या काळात अत्यावश्यक सेवाच चालू राहतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपण बंद करत नाही आहोत. लोकल, बस सुरू राहतील. पण त्या अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा देणाऱ्या वर्गाला येण्या-जाण्यासाठी त्या चालू राहतील.

पावसाळ्याची कामं पावसाळ्यापूर्वच करावी लागतात. ती कामं चालू राहतील. बँका सुरू राहतील. दूरसंचार सेवा आणि त्यांच्याशी संबंधित देखभाल सेवा सुरू राहतील. अधिसूचनाधारक पत्रकारांना मुभा देण्यात आली आहे. पेट्रोल सेवांना मुभा देण्यात आली आहे. बांधकाम साईट्सवर मजुरांची राहण्याची सोय करावी अशी बांधकाम व्यावसायिकांना विनंती आहे. तुमच्या कॅम्पसमध्ये कर्मचाऱ्यांची वसाहत असेल आणि तिथल्या तिथे वाहतूक होत असेल, तर त्याला परवानगी असेल.

हॉटेल, रेस्टॉरंटमधून फक्त होम डिलीव्हरी, टेक अवे सेवा!

हॉटेल, रेस्टॉरंट यांच्यामधून होम डिलीव्हरी आणि टेक अवे यालाच परवानगी असेल. तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण बंधनकारक असेल.

अन्नसुरक्षेअंतर्गत ३ किलो गहू, २ किलो तांदूळ मोफत

राज्य सरकार म्हणून अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत ७ कोटी लाभार्थ्यांना पुढचा महिनाभर प्रतिव्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ मोफत दिले जातील. शिवभोजन थाळी १० रुपयांत सुरू केली होती. कोविड आल्यानंतर ती ५ रुपये केली. आत्तापर्यंत काही कोटी लोकांनी या थाळीचा लाभ घेतला आहे. आता शिवभोजन थाळी पुढचा एक महिना मोफत दिली जाईल. दिवसाला आपण २ लाख थाळ्या देत आहोत. गोरगरीबांसाठी हे शिवभोजन आपण मोफत देणार आहोत. लॉकडाऊननंतर रोजीरोटीचं काय, अशी विचारणा केली जाते. रोजीचं नुकसान होईल, पण रोटीची सोय आपण केली आहे.

फेरीवाले, रिक्षावाले, बांधकाम कामगारांनाही अर्थसहाय्य

महाराष्ट्र इमारत कामगार कल्याणकारी मंडळात राज्यातल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी १५०० रुपये अर्थसहाय्य देत आहोत. यांची संख्या १२ लाखांपर्यंत आहे. नोंदणीकृत घरेलू कामगारांना निधी देत आहोत. अधिकृत फेरीवाल्यांना एका वेळचे प्रत्येकी १५०० रुपये आपण देणार आहोत. स्वनिधी योजनेत फेरीवाल्यांची बँकांमध्ये खाती असल्यामुळे थेट खात्यांमध्ये पैसे जमा होतील. त्यांची संख्या ५ लाख आहे. १२ लाख परवानाधारक शेतकऱ्यांना १५०० रुपये एकवेळचे आपण देत आहोत. आदिवासी बांधवांना खावटी सहाय्य योजनेतून एका वेळचे २ हजार रुपये देत आहोत.

जिल्हा स्तरावर आरोग्य सुविधा उभी करण्यासाठी ३ हजार ३०० कोटी फक्त कोविडसाठी बाजूला काढून ठेवतो आहोत. जिल्हाधिकाऱ्यांना थेट स्थानिक पातळीवर निर्णय घेता यावा, यासाठी हे करण्यात आलं आहे. साधारणपणे एकूण ४०० कोटींच्या या योजना आपण या माध्यमातून करत आहोत.

हे सगळं मी प्रामाणिकपणे तुमच्यासमोर ठेवलं आहे. कुठेही लपवाछपवी नाही. नाईलाजाने ही बंधनं टाकावी लागत आहेत. आरोग्यसुविधा तयार करण्यासाठी आणि साखळी तोडण्यासाठी ही बंधनं आपल्याला स्वीकारावी लागत आहेत. ही बंधनं मी एकतर्फी टाकलेली नाहीत. त्यामाग फक्त प्राण वाचावेत हाच हेतू आहे. हे अजिबात आनंददायी नाही. टीका करणारे कितीही असले, तरी त्याला न भुलता आपली जी बांधिलकी आहे, त्याला स्मरून हे निर्बंध तुमच्यावर लादत आहे. त्याचा न रागावता स्वीकार करा आणि कोविडला पराभूत करण्यासाठी कंबर कसून सहकार्य करा. असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....

Sunday, April 11, 2021

कोल्हापूर बिंदूचौक सबजेल मधील ३१ कैदी कोरोनाबाधित सापडल्याने खळबळ

 कोल्हापूर (प्रतिनिधी) : 

शनिवारी रात्री कोल्हापूर शहरातील बिंदू चौक सबजेलमधील तब्बल ३१ बंदी कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर तातडीने कारागृहात औषध फवारणी करून सबजेल निर्जंतुकीकरण करण्यात आले. सदर कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांवर कारागृहातच कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासनाला चांगलाच हादरा बसला आहे. ५ एप्रिल रोजी या कारागृहातील दोन कैद्याना शाहूपुरी पोलीस ठाण्याअंतर्गत तपासणीसाठी इचलकरंजीला नेण्यात आले होते. कारागृहात परत येताना त्यांची आरटीपीसीआर कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी एका कैद्याचा कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील ८२ कैद्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. याचा अहवाल शनिवारी रात्री कारागृह प्रशासनाला प्राप्त झाला. यामध्ये तब्बल ३१ कैद्यांचे कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर ५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. संबंधित कोरोना रुग्णांवर कारागृहातच कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....

Thursday, April 8, 2021

संकेश्वर ते आंबोली राष्ट्रीय महामार्गासाठी ५७४ कोटी रु. मंजूर; खासदार संजय मंडलिक यांची माहिती


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

कोकण व गोव्याला जाण्यासाठी आजरा – आंबोली या रस्त्याला जवळचा मार्ग म्हणून पाहिले जाते. या मार्गावर पर्यटकांची नेहमीच वर्दळ होत असते. पर्यटन, व्यापारासह उद्योग धंदा वाढीकरीता चालना मिळावी व वाहतुकीसोबत वेळेची बचत व्हावी यादृष्टीने खासदार संजय मंडलिक यांनी केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांचेकडे संकेश्वर ते बांदा दरम्यान १०८ किमी रस्त्याचे दुहेरीकरण व्हावे अशी मागणी केली असता या महामार्गावरील ६१ किमीच्या रस्त्याकरीता ५७४ कोटी रु. मंजूर झाल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यांनी दिली.

यासंदर्भात अधिक माहिती देताना खासदार मंडलिक म्हणाले, गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असून कोकणामध्येही पर्यटन मोठ्या प्रमाणात आहे. याठिकाणी कर्नाटक, महाराष्ट्रातून तसेच देश विदेशातून पर्यटक येत असतात व गोवा आणि कोकणात जावयाचे झाल्यास आजरा – आंबोली मार्ग हा जवळचा मार्ग म्हणून पाहिले जाते. सध्या या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ होत असून वाढती वाहतूक लक्षात घेता या रस्त्याला महामार्गाला दर्जा देवून या रस्त्याचे दुहेरीकरण व्हावे अशी मागणी केंद्रीय मंत्री गडकरी यांचेकडे केली होती.

यामहामार्गामुळे महाराष्ट्र व कर्नाटकातील दूध, फळे, भाजीपाला, उद्योगासाठी लागणारा कच्चा-पक्का माल हा रेड्डी पोर्टवरुन इतरत्र देशभर पाठविणे शक्य होणार असल्याने केंद्रसरकारच्या अर्थसंकल्पीय निधीतून संकेश्वर – गडहिंग्लज – कोवाडे – आजरा – गवसे – आंबोली दरम्यानच्या या ६१ किमी रस्त्याकरीता भू-संपादनासह रस्त्याच्या बांधणीकरीता ५७४ कोटी रु. मंजूर झाले आहेत. तर आंबोली ते बांदा दरम्यानच्या रस्त्याकरीता आवश्यक असणारा निधी पुढील आर्थिक वर्षात मंजूर होणार असल्याची माहिती खासदार मंडलिक यांनी पुढे दिली.

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील संकेश्वर पासून हा महामार्ग सुरु होणार असून तो पुढे मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गास जोडणारा समांतर असा होणार असल्याने या रस्त्यावरुन मोठी वाहतूक होणार असल्याकारणाने या रस्त्याला मोठे महत्व येणार आहे, असेही खासदार मंडलिक म्हणाले.

Tuesday, April 6, 2021

ग्राम, प्रभाग समित्या पुन्हा सक्रिय करा : जिल्हाधिकारी दौलत देसाई


कोल्हापूर (जिल्हा माहिती कार्यालय) : 

तलाठी, ग्रामसेवक आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांनी मतदान केंद्रनिहाय लसीकरणाबाबत नियोजन करावे. गावा-गावातील, शहरातील ग्राम तसेच प्रभाग समित्या सक्रिय करून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. छत्रपती राजर्षी शाहूजी सभागृहात दूरदृश्यप्रणालीव्दारे प्रांताधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी, तलाठी, ग्रामसेवक या सर्वांची मंगळवार (दि.६) रोजी बैठक घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, डॉ. ऊषादेवी कुंभार, तहसिलदार अर्चना कापसे, रंजना बिचकर, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक पाटील उपस्थित होते.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनी सुरूवातीला सद्यस्थितीबाबत माहिती देवून सूचना केल्या. ते म्हणाले, गृह विलगीकरणात आरोग्य सेवकांच्यामार्फत दैनंदिन तपासणी झाली पाहिजे. पूर्वीप्रमाणेच पल्स ताप याबाबत नोंदी ठेवायला हव्यात. त्याचबरोबर गृह विलगीकरणासाठी घरामध्ये स्वतंत्र व्यवस्था असल्याची खात्री करायला हवी. घराच्या बाहेर त्याबाबत फलक लावला पाहिजे. गाव पातळीवर ग्राम समित्यांमार्फत संस्थात्मक अलगीकरण कार्यान्वित व्हायला हवं. प्रतिबंधीत क्षेत्रात इली, सारी याबाबत सर्वेक्षण करायला हवे. त्याबाबत सूक्ष्म स्तरावर नियोजन करा. 


जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, लोकसंख्येच्या प्रमाणात लसीकरणात कोल्हापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. सरपंच, सदस्य, नगरसेवक, सर्व अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, पोलीस पाटील या सर्वांचे मी अभिनंदन करतो. सद्यस्थितीत सुमारे दररोज 38 हजार लसीकरण होत आहे. यामध्ये आणखी लसीकरण केंद्र सक्रिय झाल्यास 45 वर्षाच्या पुढील सर्वांचे लसीकरण महिनाअखेर पर्यंत संपू शकते. मतदान केंद्र घटक म्हणून सर्वांनी लसीकरणाबाबत सूक्ष्म नियेाजन करावे. आशा, अंगणवाडी सेविका यांना केंद्र वाटून द्या. तलाठी, ग्रामसेवक इतर अधिकारी यांनीही गावात फिरून लोकांना लसीकरणासाठी प्रेरित करावे. स्थानिक सदस्यांना सोबत घेवून ग्रामसेवक, तलाठी यांनी एकत्र नियोजन करावे. लसीकरण केंद्रांवर स्प्रे पंपाव्दारे ग्रामपंचायतीने वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी. लस दिल्यानंतरही संबंधित व्यक्ती दोन-तीन दिवस अलगीकरणात राहील. त्याशिवाय विनामास्क फिरणार नाही याबाबत प्रबोधन करावे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. पुढच्या पाच ते सहा दिवसांचा नियोजन तक्ता तयार करून 45 च्या वरील सर्वांचे लसीकरण पूर्ण करण्याबाबत मुख्याधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांनी मतदान केंद्रनिहाय नियोजन करावे. त्यासाठी शिक्षक, कृषी अधिकारी अशा इतर विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची मदत घ्या. ग्राम, प्रभाग समित्या सक्रिय करून सुविधा उपलब्ध करा. या समित्यांच्या माध्यमातून लसीकरणाचे नियोजन, प्रबोधन, संसर्ग वाढू नये यासाठी काटेकोर नियमांची अंमलबजावणी, गावातील सभागृह, शाळांमध्ये संस्थात्मक अलगीकरण सुरू करणे आदी प्रभावीपणे राबवा. 

बाहेरून गावात येणाऱ्या व्यक्तीला 7 दिवस संस्थात्मक अलगीकरण :

इतर बाहेरील जिल्ह्यातून गावात येणाऱ्या व्यक्तीला सक्तीने 7 दिवस संस्थात्मक अलगीकरण केंद्रात रहावं लागेल. गृह अलगीकरणाबाबत स्वतंत्र सोय असेल तर त्याची खात्री करून  ठेवता येईल. त्यासाठी समितीने सतर्क झालं पाहिजे. कोरोना संसर्ग होणार नाही यासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांची, आदेशांची अंमलबजावणी झाली पाहिजे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

नियमांचे तसेच आदेशाचे कुणी पालन करत नसेल तर दंडात्मक कारवाई करावी. कॉन्टक्ट ट्रेसिंगवर भर द्या. गट विकास अधिकारी, तहसिलदार यांनी तलाठी, ग्रामसेवक यांना गावं वाटून द्यावीत. सामाजिक जाणीव आणि जबाबदारी म्हणून जिल्ह्याला सुरक्षित ठेवण्याचे काम करावे, असेही ते शेवटी म्हणाले.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....

Monday, April 5, 2021

कोल्हापूर जिल्ह्यात काय सुरू, काय बंद?; जिल्हाधिकार्‍यांनी दिले आदेश


कोल्हापूर (प्रतिनिधी) : 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या सुचनांना अनुसरून सोमवार (दि. ५) रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढलेल्या आदेशानुसार अत्यावश्‍यक सेवेखाली औषध दुकानांसह किराणा, भाजीपाला, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्य दुकानांसह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (रेल्वे, टॅक्‍स, रिक्षा आणि सार्वजनिक बस) सुरूच राहणार आहेत. मद्य विक्रीसह इतर व्यवसाय मात्र 30 एप्रिल पर्यंत दिवसभर सुद्धा बंदच ठेवावे लागणार आहेत. 

राज्य सरकारने शनिवार, रविवार दोन दिवस पूर्ण संचारबंदी तर सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते रात्री आठपर्यंत जमाव बंदी व त्यांनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सात पर्यंत संचार बंदी जाहीर केली आहे. त्याच आधारे जिल्ह्यात ही हे आदेश सोमवारी मध्यरात्री पासून लागू झाले. कोणत्या सेवा सुरू राहणार, व कोणत्या बंद या संदर्भातील मार्गदर्शक सुचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जाहीर केल्या. 


हे राहणार सुरू :

सर्व रुग्णालये, औषध दुकाने, औषध निर्मिती कारखाने, आरोग्य विमा कार्यालये, भाजीपाला, किराणा माल दुकानदार, दुध डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्य पदार्थ दुकाने, रेल्वे, टॅक्‍सी, अॅटो रिक्षा, सार्वजनिक बसेस. सर्व सार्वजनिक सेवा, माल व वस्तू वाहतूक, शेती संबंधित सर्व सेवा, ई-कॉमर्स, अत्यावश्‍यक सेवेसंदर्भातील सर्व प्रकारचे माहिती तंत्रज्ञान उद्योग, सेवा स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाद्वारे प्राधिकारणाद्वारे निश्‍चित केलेल्या अत्यावश्‍यक सेवा. 

हे राहणार बंद  :

सर्व उद्याने, सार्वजनिक मैदाने (सोमवारी ते शुक्रवारी ) रात्री आठ ते सकाळी सात दरम्यान बंद राहणार इतरवेळी सुरू राहतील. 
अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा, मॉल्स्‌, पूर्ण दिवस बंद राहतील. सिनेमा हॉल, नाट्यगृह, मनोरंजन पार्क, सर्व खासगी कार्यालये, व्हिडिओ गेम पार्लर, वॉटर पार्क बंद राहणार 

रेस्टारंट, बार, हॉटेलसाठी नियमावली : 

हॉटेल मधील वास्तव्यास असलेल्या प्रवाशांसाठी रेस्टारंट आणि बार वगळता सर्व रेस्टॉरंट आणि बार बंद राहतील. सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत पार्सल सुविधा, घरपोच सेवा सुरू राहतील. शनिवार व रविवार या दिवशी फक्त घरपोच सेवा सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहतील. कोणत्याही नागरिकास सेवा घेण्यासाठी कोणत्याही रेस्टारंट आणि बार मध्ये जाता येणार नाही. घरपोच सेवेशी संबंधित कामगार वर्गाचे लसीकरण पूर्ण करावे. लसीकरण झाले नसल्यास पंधरा दिवसांसाठी कोरोनाचे व्हीई प्रमाणपत्र जवळ बाळगावे 


धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे  :

सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे बंद राहतील. धार्मिक स्थळांमध्ये सेवा करणारे सेवेकरी सर्व धार्मिक विधी पार पाडतील. भक्तांना प्रवेश असणार नाही. 

शाळा महाविद्यालय :

सर्व शाळा-महाविद्यालये बंद राहतील. दहावी आणि बारावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सूट असेल. परीक्षा घेणाऱ्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घेणे बंधनकारक आहे. सर्व प्रकारचे खासगी कोचिंग क्‍लासेस बंद राहतील. 
 
कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्याक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. लग्न समारंभांना जास्तीत जास्त 50 व्यक्ती उपस्थित असतील. अंत्ययात्रेसाठी जास्ती जास्त वीस लोकांना परवानगी देण्यात आली आहे. 

खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी त्याच ठिकाणी खाद्य पदार्थ खाण्यास देवू नये. घरपोच सेवा सकाळी सात ते रात्री आठ असेल. 

सर्व केशकर्तनालय, स्पा, ब्युटी पार्लर बंद राहतील. 

कारखाने व उत्पादक अस्थापना यांनी कर्मचाऱ्यांना शरीराचे तापमान तपासूनच प्रवेश द्यावा. लवकरात लवकर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे. पाचशे पेक्षा अधिक कर्मचारी असणाऱ्या कारखान्यांनी स्वतःचे अलगीकरण केंद्र स्थापन करावे, गर्दीही करू नये, कर्मचारी कोविड पॉझिटीव्ह आल्यास कारखाना किंवा अस्थापना बंद ठेवावी, कोविड पॉझिटीव्ह आल्यास कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करता येणार नाही. 

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....

जि. प. सदस्य जीवन पाटील यांना राष्ट्रीय भारत ज्योती गौरव अॅवार्ड जाहीर


गारगोटी (प्रतिनिधी) :

 कुर (ता. भुदरगड) येथील आकुर्डे मतदार संघाचे जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांना त्यांनी केलेल्या विविध सामाजिक उपक्रम व विक्रमी विकासकामांसाठी पोहच पावती म्हणून  इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी न्यु दिल्ली यांच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय भारत ज्योती गौरव अॅवार्ड जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण्याच्या शानदार कार्यक्रमात देशाचे राष्ट्रपती, विविध राज्यांचे राज्यपाल व इतर मान्यवर उपस्थित असणार आहेत. हा गौरव सोहळा ९एप्रिल २०२१ रोजी दिल्ली येथे लुढिया गार्डन मध्ये होणार आहे. या पुरस्काराबद्दल जीवन पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....

Sunday, April 4, 2021

स्त्रीच्या मनातील स्पंदने म्हणजे "आठवणींच्या हिंदोळ्यावर"; नवलेखिका अश्विनी सावंत-व्हरकट यांच्या पुस्तक प्रकाशनप्रसंगी कॉ. संपत देसाई यांचे प्रतिपादन


आजरा (प्रतिनिधी) :

सासूरवासिण स्त्रीकडे माहेर व सासूरच्या आठवणिंचा खजिनांच असतो. तिच्या मनात भावभावना दाटलेल्या आसतात. या दाबून राहिलेल्या भावभावना नवलेखिका अश्विनी सावंत-व्हरकट यांनी "आठवणींच्या हिंदोळ्यावर" या पुस्तकाच्या माध्यमातून उलघडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच आठवणींच्या हिंदोळ्यावर हे पुस्तक स्त्रीच्या मनातील स्पंदने आहेत प्रतिपादन कॉ. संपत देसाई यांनी केले. ते अश्विनी सावंत-व्हरकट लिखीत "आठवणींच्या हिंदोळ्यावर" व "पारंपरिक गौरी व हादग्याची गीते" या पुस्तकांच्या प्रकाशनप्रसंगी बोलत होते. श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजरा महाविद्यालयाचे उपप्राचार्य राजीव टोपले होते. जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील व प्रा. सुभाष कोरे यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन झाले.

नवलेखिका अश्विनी सावंत व्हरकट यांनी पुस्तके लिहण्यामागची आपली भावना व प्रेरणा स्पष्ट केली. यावेळी बोलताना प्रा. सुभाष कोरे म्हणाले, ललित साहित्य वाचकाला तहान-भूक विसरायला लावते. वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे असे म्हणणे चुकीचे ठरत आहे. उलट सध्या समृद्ध वाचन परंपरेची जोपसना होत आहे. साहित्य हा समाज मनाचा आरसा आहे. चांगला समाज हा साहित्यातूनच घडतो. सध्या वास्तववादी साहित्याची मांडणी होणे गरजेचे आहे. परखड व ग्रामीण समस्या मांडल्या पाहिजेत. समाज चांगला व निकोप व्हावा याकरिता लेखन होणे गरजेचे आहे. यावेळी संवेदना फौंडेशनचे सचिव संतराम केसरकर यांनी संवेदनाच्या विविध उपक्रमांची माहीती दिली. यावेळी जीवन पाटील, डॉ. सागर वांद्रे, राजीव टोपले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आनंदराव व्हरकट, बाळ सावंत, बजरंग व्हरकट, संकेत सावंत, सचिन सावंत, सुमन सावंत, भुदरगड पं. स. माजी सदस्य जयवंत चोरगे, विनय पब्लिकेशनचे रविंद्र खैरे, पेरणोलीच्या सरपंच उषा जाधव, उपसरपंच उत्तम देसाई, पांडुरंग लोंढे, शैलेश  मुळीक, रणजीत माडेकर, अंकुश सावंत, अमृत सावंत, दिनेश कांबळे यांच्यासह सावंत, व्हरकट परिवार उपस्थित होता. सूत्रसंचालन दयानंद भंडारी यांनी केले.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....

महाराष्ट्रात कठोर निर्बंध; काय सुरु अन् काय बंद जाणून घ्या


मुंबई (प्रतिनिधी) :

मागील काही दिवसांत महाराष्ट्र राज्यात करोनानं अक्षरक्षः थैमान घातल्यानं राज्य सरकारची झोप उडाली आहे. प्रचंड वेगानं होत असलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सेवेवर ताण येण्यास सुरूवात झाली असून, रुग्णांचे हाल टाळण्यासाठी आणि विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाउन संदर्भात चाचपणी सुरू होती. सर्वच क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत रविवारी लॉकडाउन / कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीत राज्यात करोनाचं संक्रमण रोखण्यासाठी कठोर निर्बंध घालण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी निर्णयांची माहिती दिली. राज्यात सोमवार (दि. ५) पासून कडक नियम लागू होणार असून, रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून, दिवसा १४४ कलम लागू (जमावबंदी) असेल, असं मलिक यांनी सांगितलं.

नवाब मलिक म्हणाले, करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक नियमावली तयार करण्यात आली आहे. सोमवार रात्री (५ एप्रिल) ८ वाजेपासून ही नियमावली लागू होईल. रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात संचारबंदी असेल. इतर वेळी जमावबंदी आदेश लागू असतील. सर्व मॉल्स, रेस्तराँ, बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. होम डिलिव्हरी आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेनं सुरू राहतील. उद्योग संपूर्ण क्षमतेनं सुरू राहणार असून, कामगारांवर बंधनं नसतील. जिथे कामगारांना राहण्याची व्यवस्था असलेली बांधकामं सुरू राहतील. मंडईत निर्बंध नसतील, पण गर्दी कमी करण्यासाठी नियम करण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाउन असेल. हा निर्णय मंत्रिमंडळाने एकमताने घेतला आहे,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

“राज्यात शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत कठोर लॉकडाऊन लागू असणार आहे. हा निर्णय एकमतानं घेण्यात आला आहे. निर्णय घेण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेत्यांशी, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याशीही चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत हॉटेल व्यावसायिक, उद्योजक, जीम चालक आणि सिनेसृष्टीतील दिग्गजांशीही चर्चा केली आहे. राज्यात करोना वाढत असताना एकजुटता दिसली पाहिजे, त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी राजकीय नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा केली,” असं नवाब मलिक म्हणाले.

काय काय बंद राहणार?

राज्यात आठवड्याला लॉकडाऊनमध्ये बंद पाळण्यात येणार आहे. या काळात राज्यातील गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळं बंद राहतील. तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. फक्त पुजाऱ्यांना मंदिरात पूजा करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र या काळात सार्वजनिक आणि खासगी वाहतूकीवर कोणतेही निर्बंध नसतील, अशी माहिती मलिक यांनी सांगितलं.

● राज्यात विकेंड लॉकडाऊनच्या काळात राज्यातील गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद राहतील. 

● तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. 

असा असणार विकेंड लॉकडाऊन?

● उद्या रात्री 8 वाजेपासून नियमावली लागू.
● रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत रात्रीची संचारबंदी.
● सरकारी कार्यालय 50 टक्के क्षमतेनं काम करणार.
● इंडस्ट्री चालू राहणार, कामगारांवर कुठलेही निर्बंध नाही.
● बांधकाम चालू, सरकारी ठेके असलेली कामं सुरु राहणार.
● भाजी मार्केटवर निर्बंध नाहीत. मात्र कठोर निर्णय.
● सर्व ट्रान्सपोर्ट व्यवस्था सुरु राहणार, मास्क बंधनकारक.
● शुटिंगवर गर्दी होणार नाही तिथे परवानगी, चित्रपटगृहे बंद राहणार.
● मॉल, बार, रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय, डिलिव्हरी सर्व्हिस चालू.
● क्षमतेपेक्षा 50 टक्क्याने सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....

Saturday, April 3, 2021

आजरा तालुक्यात १३ कोरोना रुग्ण


आजरा (प्रतिनिधी) :

आजरा तालुक्यात शनिवारी २४ तासात १३ रुग्ण सापडले आहेत. यामध्ये भादवणमध्ये ५, मुरुडे २, निंगुडगे, चिमणे, देवर्डे, सोहाळे, कानोली मडिलगे येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...