आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, आता मराठी भाषा ज्ञानभाषा झाली पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. अशोक बाचुळकर यांनी नुकतेच येथे केले. आजरा महाविद्यालयातील मराठी विभागाच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त डॉ. बाचुळकर यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी डॉ. रणजित पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
डॉ. बाचुळकर पुढे म्हणाले की, मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. महाराष्ट्रातील सण-उत्सव, लोककला आणि खाद्यसंस्कृती या सर्वांचे मूळ मराठी भाषेतच आहे. भाषेमुळेच आपण आपल्या परंपरांशी जोडले गेलो आहोत. आज मराठी भाषा केवळ घरापुरती मर्यादित नसून ती प्रशासन, न्यायालय आणि शिक्षणाची भाषा म्हणूनही विकसित होत आहे. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे या भाषेचे महत्त्व अधिकच वाढले आहे. यामुळे संशोधनाला आणि भाषेच्या संवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रा. विनायक चव्हाण, डॉ. एम. बी. जाधव, डॉ. सुनील पाटील आदी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आप्पासो बुडके यांनी तर मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
Subscribe to:
Post Comments (Atom)
२१जुलै रोजी आजरा नगरपंचायतीसमोर भजन व ढोल ताशा सह आंदोलनाचा इशारा...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... सामाजिक सेवा प्रतिष्ठान आजरा (रजि.) प्रणित अन्याय निवारण समिती, आजरा यांच्या वतीने आजरा नगरपंचाय...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क... संक्रातीच्या सणादिवशी पतंग उडवत असताना लाकडी ओंडका अंगावर पडल्याने आदर्श किरण पोवार (वय 11, सध्या...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोहाळे पैकी सोहाळेवाडी (ता. आजरा) येथील प्रशां...
No comments:
Post a Comment