वंचित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणल्याचे समाधान : आमदार प्रकाश आबिटकर; विविध धनगरवाड्यावर जाणाऱ्या रस्ते कामाचा शुभारंभ
आजरा वृत्तसेवा :
अनेक वर्षापासून विकासापासून वंचित असणाऱ्या ठिकाणी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी देत विकासाची प्रकाश वाट निर्माण केली आहे. राजकारण करत असताना चांगले घडू शकते याची उदाहरणं म्हणजे आवंडी धनगरवाड्याचा विकास होय. वंचित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणल्याचे या माध्यमातून समाधान मिळाले असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले ते आजरा तालुक्यातील विविध धनगरवाड्यांवर जाणाऱ्या 4 कोटी 7 लाखांच्या रस्ते कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. तहसीलदार समीर माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार आबिटकर यांच्या हस्ते आवंडी धनगरवाडा, नावलकरवाडी धनगरवाडा, किटवडे धनगरवाडा कडे जाणाऱ्या विविध 4 कोटी 7 लाखाच्या रस्ते विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. आमदार आबिटकर पुढे म्हणाले, धनगरवाडे हे जैवविविधतेचे प्रतीक आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या निसर्गाचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यामुळे या ठिकाणच्या विकासाबरोबरच पर्यटन संधी देखील निर्माण होण्याची गरज आहे. विकास कामासाठी निधी मिळत असताना दर्जेदार विकास कामे होणे देखील तितकेच गरजेचे आहे, यासाठी स्थानिकांनीही कटाक्षाने लक्ष द्यावे. राधानगरी विधानसभा मतदारसंघातील वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी एक ही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्नशील असल्याची त्यांनी सांगितले. यावेळी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, बांधकाम विभागाचे उप अभियंता राजेंद्र सावंत, वनविभागाचे संजय निळकंठ यांच्यासह उपसरपंच कोकरे, बाबू येडगे, संजय पाटील, दत्ता पाटील, विजय थोरवत, इंद्रजीत देसाई, जितेंद्र भोसले, संतोष भाटले, रणजीत देसाई उपस्थित होते. गंगाराम येडगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सत्यवान सोने यांनी सूत्रसंचालन केले.
==============
No comments:
Post a Comment