आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
ग्रामपंचायत मौजे सोहाळे, बाची, सोहळेवाडी (ता. आजरा) येथे वटपौर्णिमेचे औचित्य साधून महिलांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वडाची झाडे लावून अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली. यावेळी महिलांनी पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमेची पूजा केली तसेच भविष्यातील पिढ्यांसाठी पर्यावरणाचे जतन करण्याचा संकल्प करत वडाची रोपे लावली. "एक सण – एक वृक्ष" हा संदेश देत वृक्षसंवर्धनाचे महत्त्व उपस्थितांना पटवून देण्यात आले.
या उपक्रमात ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. भारती डेळेकर, सदस्या लिला देसाई, रमा कांबळे, निर्मला दोरुगडे, निशा देसाई, अनंत विद्यामंदिर शिक्षिका सौ. निकम , सौ. आजगेकर व सौ. प्रियांका पाटील (वनरक्षक) यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर वृक्षारोपण कार्यक्रमास महिला बचत गटांच्या सदस्य तसेच सोहाळे बाची गावच्या ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. या अभिनव उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत करत, धार्मिक परंपरेसोबत पर्यावरण संरक्षणाची जोड देणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली.
========================
No comments:
Post a Comment