आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
गल्ली पासून दिल्लीपर्यंत विकास साधण्याची किमया भारतीय जनता पार्टी वेगाने करत आहे. आजरा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे भाजपा करत आली आहे, इथून पुढेही करत राहणार आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील जनतेने भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ठामपणे राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अनिकेत चराटी यांनी केले. ते जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारार्थ दाभिल (ता. आजरा) येथे बोलत होते. भारतीय जनता पार्टीचे पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार जयवंत सुतार, पेरणोली पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार स्मिता देसाई यांच्या प्रचारार्थ दर्डेवाडी, दाभील, मेढेवाडी, खेडगे, पारपोली गावात संपर्क दौरा झाला. या संपर्क दौऱ्याला नागरिकातून चांगला प्रतिसाद मिळाला.
तालुकाध्यक्ष चराटी पुढे म्हणाले, भारतीय जनता पार्टीने केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना सर्वसामान्यांच्या पर्यंत तळागाळात पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वच विकास कामांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे सर्वच भाग सुजलाम सुफलाम होत आहे. यावेळी सर्वच भागातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांशी ठामपणे राहण्याचा निर्धार केला. यावेळी उमेदवार जयवंत सुतार, उत्तम देसाई, आनंदा कातकर, दीपक गवळी, विनायक परुळेकर, गजानन वास्कर, प्रकाश कविटकर, बळवंत शिंत्रे, लहू वाकर, अनिल नार्वेकर, पांडुरंग पाटील, सुनील पाटील, लहू मस्कर, शशिकांत पाटील, तुकाराम राणे, संभाजी हसबे, विश्वास गवळी, राजवर्धन सरदेसाई, अमृत देसाई, अनिल केरकर, प्रकाश शेटगे, सुरेश पाटील, संभाजी पाटील, पांडुरंग राणे, विठोबा पाटील, कुंडलिक सुतार, तुकाराम दळवी, पुंडलिक पाटील, मारुती पाटील, ईश्वर पाटील, बाळकृष्ण घाटकर, शिवाजी गुरव, संतोष दळवी, सुरेश वास्कर, मारुती कांबळे, दत्तू घाटकर, अनिकेत दळवी, पंकज वास्कर यांच्यासह कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment