Tuesday, September 30, 2025

1 नोव्हेंबरपासून राज्यातील उसाचा गळीत हंगाम सुरु होणार, मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई, विकास न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. यंदाचा उसाचा गळीत हंगाम येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकातील कारखान्यांबरोबर सीमेलगतच्या कारखान्यांना हंगाम सुरु करण्याची मुभा देण्यात आली आहे. 

महाराष्ट्रातील ऊस कर्नाटकात जाऊ नये म्हणून राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. या हंगामात एकूण 1 हजार 250 लाख टन ऊस उपलब्ध असेल असा अंदाज देण्यात आला आहे. मुख्यमंत्री निधीसाठी दरवर्षी घेण्यात येणारे प्रतिटन 5 रुपयांवरुन 15 रुपये करण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. 
===================

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...