आजरा (प्रतिनिधी) :
महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मानसिक संतुलन ढासळल्यासारखे वक्तव्य करीत आहेत, अशी घणाघाती टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. त्यामुळेच पाटील डोक्यावर परिणाम झाल्यासारखं खुळ्यासारखं बडबडत आहेत, असा उपहासात्मक टोलाही त्यांनी लगावला. चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेबद्दल मंत्री मुश्रीफ यांनी आजरा येथे झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या प्रचार मेळाव्यात खरपूस समाचार घेतला
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, बहुजनांचे नेतृत्व म्हणून शरद पवार यांनी नवा महाराष्ट्र घडविला. दहा ते बारा लोकसभेच्या व दहा ते बारा विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या. देशाचे कृषी मंत्री, संरक्षण मंत्री या पदांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान निश्चितच मोठे आहे. राज्यात आणि केंद्रातही विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी काम केले. तसेच ते एकदाही पराभूत झालेले नाहीत. ते म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी काहीही न करता त्यांना एकदा नव्हे दोनदा केवढी मोठी संधी मिळाली होती. किती भाग्यवान आहेत ते. परंतु या सगळ्याचा राज्याला तर सोडाच कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा काहीही उपयोग झालेला नाही.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे, जयवंतराव शिंपी, वसंतराव धुरे, दिलीप लाड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई, तानाजीराव देसाई यांची भाषणे झाली. स्वागत संभाजी तांबेकर यांनी केले. प्रास्ताविक आजरा पंचायत समितीचे माजी सभापती अल्बर्ट डिसोझा यांनी केले.
ते आमचे उमेदवार नव्हेत
मेळाव्याआधी मंत्री मुश्रीफ यांच्यासह प्रमुख मान्यवर जनता बँकेच्या सभाग्रहात चहा घेत बसले होते. त्यावेळी हातात पावती घेऊन एक शेतकरी आला आणि मंत्री मुश्रीफ यांना विचारले, 'हिंदुस्तान शुगरच्या नावाखाली पैसे घेऊन गेलेले ते तुमचे उमेदवार आलेत काय? त्यावेळी मंत्री मुश्रीफ यांनाही क्षणभर काहीच समजेनासे झालले. विषय लक्षात येतात मंत्री मुश्रीफ शेतकऱ्याला म्हणाले, आमचे उमेदवार अरुण लाड व जयंत आसगावकर आहेत. ते पैसे घेऊन गेलेले आमचे उमेदवार नव्हेत. नंतर या विषयाची ही जोरदार चर्चा सुरू झाली.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब....
9049969625
No comments:
Post a Comment