Saturday, December 26, 2020

विजयी संघाला बोकड; आजरा तालुक्यात प्रथमच रंगणार अनोख्या बक्षीसांची क्रिकेट स्पर्धा


आजरा (प्रतिनिधी) :

तसं पहायला गेलं तर क्रिकेट व खाद्यसंस्कृती यांचा दुरान्वयेही संबध नाही. मात्र क्रिकेट स्पर्धेत खवय्यांसाठी पर्वणी ठरणारी बक्षीसे असतील तर..... आतापर्यंत आपण स्पर्धांसाठी रोख रक्कमेची किंवा शिल्ड, मेडलची बक्षीसे असल्याचे ऐकले असेल. पण साळगाव (ता. आजरा) येथील क्रिकेटप्रेमी युवकांनी अनोख्या बक्षीसांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेच्या विजयी संघाला चक्क बोकड बक्षीस मिळणार आहे. उपविजेत्या संघाला आठ गावठी कोंबडे तर तिसर्‍या क्रमांकाच्या संघाला सहा गावठी कोंबडे बक्षीस मिळणार आहे. याबरोबरच आकर्षक वैयक्तिक बक्षीसेही ठेवण्यात आली आहेत. या क्रिकेट स्पर्धेतील विजयी संघांची थर्टीफस्ट संस्मरणीय होणार आहे. ही स्पर्धा पेरणोली रोडवरील क्रीडांगणावर सोमवार (दि. २८) पासून रंगणार आहे. भव्य ओपन हाफ-पिच क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडू एकाच गावातील आवश्यक आहेत.  या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निलेश पाटील (मो.९४०४९९०४२१), ओंकार माडभगत (९४२१७१२०७४), विनायक लोहार (९४२२११७३७३) व रोहन पारके (८६००२२२१२५) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब......

Monday, December 21, 2020

महाराष्ट्रात मंगळवारपासून रात्रीची संचारबंदी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय


मुंबई (प्रतिनिधी) :

महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत महानरपालिका क्षेत्रात संचारबंदी केली जाणार आहे. २२ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालवाधीत ही संचारबंदी लागू असणार आहे. ब्रिटनमध्ये करोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांची एक बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये करोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आला आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू वेगाने पसरत असून या विषाणूची घातकता पुढील काही दिवसात कळेल त्यामुळे आजपासूनच राज्यात यासंदर्भात अधिकची सतर्कता बाळगली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना आजपासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाइन बंधनकारक करण्यात आले आहे. अशा प्रवाशांना क्वारंटाइन केल्यानंतर त्यांची पाचव्या अथवा सातव्या दिवशी कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) केली जाईल. त्यांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल. ज्या विमानतळांवर आंतरराष्ट्रीय विमाने उतरतात तेथील महापालिका आयुक्तांनी अशा प्रवाशांना क्वारंटाइन करण्यासाठी हॉटेल आणि स्वतंत्र हॉस्पिटलची व्यवस्था करावी. त्याचबरोबर युरोपातून आलेल्या प्रवाशांना नव्या विषाणूची लक्षणे असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची देखील व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....

Friday, December 18, 2020

प्राप्तिकर विभागाचा निरिक्षक दहा लाखाची लाच घेताना ताब्यात; कोल्हापूरातील प्रकार


कोल्हापूर (प्रतिनिधी) :  

एका डॉक्टर कडून छापा न टाकण्यासाठी तब्बल दहा लाखाची लाच घेताना प्राप्तिकर विभागाचा निरीक्षक आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. प्रताप महादेव चव्हाण (वय ३४ रा. राजारामपुरी कोल्हापूर) असे या निरीक्षकाचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी लक्ष्मीपुरी परिसरातील विल्सन फुलावर चव्हाणला दहा लाख रुपये घेताना पकडले.

कोल्हापूर शहरातील डॉक्टर विरोधात अज्ञात व्यक्तीने प्राप्तिकर विभागाकडे तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाच्या अनुषंगाने प्राप्तीकर विभागाकडून संबंधित डॉक्टरांची चौकशी सुरू होती. या चौकशी दरम्यान घरावर छापा टाकण्याचा इशारा निरीक्षक चव्हाण यांनी दिला होता. हा छापा टाकू नये यासाठी डॉक्टरने चव्हाण यांना विनंती केल्यानंतर यासाठी सुरुवातीला चव्हाण यांनी 25 लाख रुपयाची लाच मागणी केली. शेवटी हा व्यवहार 14 लाख रुपये असा ठरला. ठरलेल्या रकमेपैकी दहा लाख रुपये शुक्रवारी देण्याचे ठरले होते. ही रक्कम घेताना चव्हाण याला लातूर विभागाने अटक केली. 

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब......

Tuesday, December 15, 2020

भाजप प्रदेशाध्यक्षांच्या राजीनाम्याची भाजपच्याच कार्यकर्त्यांकडून मागणी; चंद्रकांत पाटील यांना घरचा आहेर


कोल्हापूर (प्रतिनिधी) :  

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील आणि कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपच्याच काही पदाधिकाऱ्यांनी करत चंद्रकांतदादांना घरचा आहेर दिला आहे. नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून दोघांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपमध्ये उभी फूट पडली आहे. 

सत्तेत असताना चंद्रकांत पाटील यांनी इतर पक्षात फोडाफोडी करून अनेकांना भाजपमध्ये घेतले. पण जुन्या जाणत्यांना डावलून नव्यांना व इतर पक्षातून आलेल्यांनाच पदे दिली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या पदाधिकाऱ्यांमधून नाराजीचा सुर उमटत आहे. त्यातच पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणूक गांर्भियाने घेतली नसल्याने भाजपचा पराभव झाला. त्यामुळे या पराभवाची जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष  समरजितसिंह घाटगे यांनी राजीनामा द्यावा, असा घरचा आहेर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. भाजपाचे कोल्हापूर  जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा, हातकणंगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी चंद्रकांतदादा पाटील व समरजित घाटगे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.  
 
आमदार चंद्रकांत पाटील हे राज्यातील सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांना नेहमीच आव्हान देत असतात. मात्र होमगाऊंडवरील भाजपच्याच कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या नेतृत्त्वाला आव्हान दिले आहे. त्यामुळे आपल्या विरोधकांना अंगावर घेणारे चंद्रकांत पाटील घरातील हे आव्हान कसे थोपवणार, याची चर्चा सुरू झााली आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....

Monday, December 14, 2020

'संत गजानन' मध्ये प्रवेशासाठी उस्फूर्त प्रतिसाद


महागाव (प्रतिनिधी) :

महागाव (ता.गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज शिक्षण समुहात शैक्षणिक वर्षे 2020-21 साठीच्या प्रवेशप्रक्रियेसाठी इंजिनिअरिंग, बी.फार्मसी, पॉलिटेक्निक, डी.फार्मसी व इतर वैद्यकीय विद्याशाखेत प्रवेशासाठी विद्यार्थाकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुदतीच्या आत सर्व विद्यार्थाना प्रवेश मिळावा यासाठी संस्थेच्यावतीने आजरा, उत्तूर, मुदाळतिट्टा, निपाणी, सावंतवाडी याठिकाणी 
प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्राकडून विद्यार्थी व पालकांना उपलब्ध शासकीय सोई सवलती, शिष्यवृत्ती, प्लेसमेंट, शैक्षणिक कर्ज योजना, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे, राहणेची व जेवणाची सोय याबरोबरच इतर सुविधा याची माहिती तज्ञ प्राध्यापक वर्गाकडून करण्यात येत आहे. तरी इच्छुक विद्यार्थानी मुदतीच्या आत महागाव येथील प्रधान कार्यालय व संबंधित महाविद्यालयात नाव नोंदणी कागदपत्र पडताळणी व प्रवेश घ्यावा असे आवाहन संस्थाध्यक्ष अॅड. आण्णासाहेब चव्हाण,  सचिव अॅड. बाळासाहेब चव्हाण यानी केला आहे.
        
सध्या या समुहातील महागाव व हसुरवाडी या दोन कँपस मधून 13 विद्याशाखेद्वारे चार हजारहून आधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तसेच 600 हून अधिक शिक्षक, डॉक्टर्स व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून ज्ञानदानाचे कार्य होत आहे. उत्कृष्ट शैक्षणिक कार्य विद्यार्थाना मिळणारे प्लेसमेंट या कार्याची दखल घेत राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय अनेक पुरस्काराने या शिक्षण समुहाला गौरवण्यात आला आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....

Friday, December 4, 2020

पुणे पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे अरूण लाड विजयी; जाणून घ्या उमेदवारनिहाय मते


पुणे (प्रतिनिधी) : 

भाजपाचा बालेकिल्ला असणार्‍या पुणे पदवीवर मतदार संघावर महाविकास आघाडीने आपला झेंडा फडकविला आहे. महाविकास आघाडीच्या (राष्ट्रवादीचे उमेदवार) अरुण लाड यांनी भाजपच्या संग्राम देशमुख यांच्यावर ४८,८२४ इतक्या विक्रमी मताधिक्याने विजय मिळविला. 

पुणे पदवीधरच्या इतिहासात यावेळी प्रथमच मोठ्या संख्येने मतदान झाले. २,४७,६८७ इतके मतदान झाले. त्यापैकी १९,४२८ मते अवैध ठरली. २,२८,२५९ वैध मते होती. त्यामुळे १,१४,१३० मतांचा कोटा विजयासाठी निश्चित करण्यात आला. यामध्ये महाविकास आघाडीचे अरुण लाड यांनी पहिल्या पसंतीची १,२२,१४५ मते मिळवत विजय प्राप्त केला. भाजपचे संग्राम देशमुख यांना ७३,३२१ मते मिळाली. मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे यांना ६७१३, आपच्या डॉ. अमोल पवार यांना ११२१, जनता दलाच्या प्रा. शरद पाटील यांना ४२५९, सोमनाथ साळुंखे यांना ३१३९, धनजंय गोंदकर यांना ९८९, निता ढमाले यांना ५३२, श्रीमंत कोकाटे यांना ६५७२, युवराज पवार यांना ५२० मते मिळाली. महाविकास आघाडिच्या उमेदवाराच्या नावाचा उमेदवार असलेल्या अपक्ष अरुण लाड यांना २५५४ मते मिळाली.

बातमीकरिता संपर्क 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....

Wednesday, December 2, 2020

युवक नेते राहूलदादा देसाई यांचा वाढदिवस उत्साहात साजरा


गारगोटी (प्रतिनिधी) :

गारगोटी येथे माजी जिल्हा परिषद सदस्य व युवक नेते राहूलदादा देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आबालवृध्दांनी देसाई यांच्या संपर्क कार्यालयात  मध्ये गर्दी केली. यावेळी राधानगरी-भुदरगड-आजरा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यानी देसाई यांचा सत्कार केला.

राहूल देसाई यांना महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र  फडवणीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, आमदार पी. एन .पाटील, माजी आमदार व बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील, माजी आमदार अमल महाडिक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, गोकुळचे संचालक अंबरिशसिंह घाटगे, आजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अशोक चराटी, दूध साखर बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे, राजेंद्र मुकदम, सरदार मिसाळ, विजय भोजे यांनी फोन द्वारे शुभेच्छा दिल्या.
 
गोकुळ संचालक धैर्यशील देसाई,  बिद्री साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन सुनीलराव सुर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदीगरे, मनोज फराकटे, माजी उपसभापती सत्यजित जाधव, बिद्रीचे संचालक धोंडीराम दादा मगदूम, प्रदीप पाटील, मधुकराव भोई, शिक्षक नेते दादा लाड, गोकुळचे माजी संचालक दिनकरराव कांबळे, वसंतराव प्रभावळे, भाजपाचे सरचिटणीस प्रवीण सावंत, उपाध्यक्ष नाथाजी पाटील, अध्यक्ष डॉ. विनायक परूळेकर, तालुका संघाचे उपाध्यक्ष एम. डी. पाटील, गारगोटीचे सरपंच संदेश भोपळे, सर्व सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. स्वागत  अनिल तळकर यांनी केले. प्रास्ताविक बजरंग कुरळे यांनी तर आभार  प्रकाश वास्कर यांनी मानले.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....

राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; वर्षभराचा १०० टक्के जीएसटी परतावा मिळणार


 मुंबई (प्रतिनिधी) :

 महाविकास आघाडी शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी २०२० पासून राज्य शासनाच्या हिस्स्याचा १०० टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रोत्साहन अनुदान म्हणून दिले जाणार आहे. यासंबंधीचे शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. विशेषतः कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ होणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.

 राज्यातील काजू उत्पादक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी राज्य शासनाकडून जीएसटी परतावा मिळण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी संबंधितांची बैठक घेऊन जीएसटी परतावा देण्याचा निर्णय घेतला होता. यासंबंधीचा शासन निर्णय बुधवारी (दि. २) रोजी जारी करण्यात आला.

 राज्यामध्ये उत्पादीत व प्रक्रिया केलेल्या काजुपैकी राज्यात विक्री झालेल्या काजुच्या विक्रीवर देय असलेल्या वस्तू व सेवा करापैकी राज्याच्या हिस्स्याचा १०० टक्के ढोबळ जीएसटी प्रोत्साहन अनुदान म्हणून काजू प्रक्रिया उद्योगास दिले जाणार आहे. १ जानेवारी २०२० पासून ही सवलत लागु राहणार आहे.

काजू प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन अनुदानासाठी काही अटी ठेवण्यात आल्या असून त्या खालील प्रमाणे

1) काजू प्रक्रिया घटकाने संबंधित कालावधीसाठी त्यांनी केलेल्या काजूच्या विक्रीवर Input Tax वजा जाता उर्वरित राज्य वस्तू व सेवा कराचा भरणा करणे आवश्यक आहे.

2) काजू प्रक्रिया उद्योग घटकाने काजूच्या विक्रीवर देय राज्य वस्तू व सेवा कराबाबत संबंधित राज्यकर सह आयुक्त (एसजीएसटी प्रशासन) यांनी भरलेल्या कराचे पुरावे तपासून तसे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.

3) अनुदान पात्र काजू प्रक्रिया उद्योग घटकाने प्रोत्साहन अनुदानाचे तिमाही/ अथवा यथास्थिती करदेयतेप्रमाणे सहामाही दावे उद्योग संचालनालय/संबंधित जिल्हा उद्योग केंद्र यांचेकडे सादर करावेत.

4. शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संगणक संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२०१२०२१०५६५५८९१० असा आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....

मोठी बातमी! करोनावरील लस आली; पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये लसीकरणास प्रारंभ



नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) :

संपूर्ण जगाचे कान जी बातमी ऐकण्यासाठी आसुसलेले होते… अखेर ती आनंदवार्ता आली आहे. करोनावरील जगातील पहिली लस पुढच्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे. ब्रिटन सरकारने फायझर बायोटेकच्या लशीला परवानगी दिली असून, पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये नागरिकांना लस दिली जाणार आहे. करोनावरील लशीला परवानगी देणारा ब्रिटन पहिला देश ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच फायझरने करोनावर प्रभावी लस तयार करण्यात यश आल्याची घोषणा केली होती.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...