वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चालू हंगामात आजअखेर 1 लाख 78 हजार 880 मे.टन ऊसाचे गाळप झाले असुन कारखान्याकडे दि. 1 डिसेंबर 2024 ते 15 डिसेंबर 2024 अखेर गाळप झालेल्या ऊसाची बिले प्रतिटन 3 हजार 100 रुपये प्रमाणे 15 कोटी 23 लाख रुपये विनाकपात ऊस पुरवठादार शेतक-यांच्या सेव्हींग खातेवरती जमा करण्यात आली आहेत. त्याचबरोबर 30 नोव्हेबर 2024 अखेरची ऊस तोडणी वाहतुक बिलाची 2 कोटी 75 लाख रुपये इतकी रक्कम संबंधीत कंत्राटदारांचे खातेवर जमा करणेत आली असून संबंधित ऊस पुरवठादार शेतकरी व तोडणी वाहतुक कंत्राटदार यांनी आपल्या बँकेशी संपर्क साधून बिलाची रक्कम उचल करावी अशी माहिती कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे यांनी दिली.
चेअरमन धुरे पुढे म्हणाले, हंगाम 2024-25 मध्ये करखाना व्यवस्थापनाने ठेवलेल्या उददीष्टा प्रमाणे गाळपाचे नियोजन केले असुन सद्या येत असलेल्या ऊसाचे गाळप करून हंगाम यशस्वी करणेचा प्रयत्न करीत आहोत. कारखान्याकडे उपलब्ध असलेल्या बीड व स्थानिक तोडणी-वाहतुक यंत्रणा कार्यक्षेत्रात लावुन प्राधान्याने ऊसाची उचल करणेचे नियोजन केले आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेचे अध्यक्ष ना. हसन मुश्रीफ यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेच्या सहकार्याने कारखान्याकडे गाळपास येणा-या संपुर्ण ऊसाची बिले व तोडणी वाहतुकीची बिले नियमितपणे आदा करणेचे नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.
कार्यक्षेत्रात ज्या भागात यंत्रणा कमी आहे अशा ठिकाणी यंत्रणा उपलब्ध करून कारखान्याकडे जास्तीत जास्त कार्यक्षेत्रातील ऊस आणुन ऊस उत्पादकांना दिलासा दिला जाणार आहे. आज देखील कार्यक्षेत्रात शिल्लक असलेला ऊस वेळेत गाळपास आणणेचे नियोजन व्यवस्थापनाने केले आहे. सद्या कार्यक्षेत्रातील हत्ती, गवे इत्यादी जंगली प्राण्यांनी नासधूस केलेल्या ऊसाचे तोडणीस प्राधान्य दिले जात आहे. सदर बाधीत क्षेत्र आटोक्यात येताच ज्या गावात यंत्रणा नाही किंवा अपुरी आहे तेथे प्राधान्याने यंत्रणा लावुन ऊस उचल करीत आहोत. त्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला ऊस अन्य कारखान्यांना न घालता थोडे थांबुन व्यवस्थापनास सहकार्य करावे व आपला संपूर्ण ऊस आपल्याच कारखान्यास गाळपास पाठवावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे यांनी संचालक मंडळाच्या वतीने केले.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन मधुकर देसाई, जिल्हा बँकेचे संचालक तथा बैंक प्रतिनिधी सुधीर देसाई, कारखानचे संचालक विष्णू केसरकर, उदयसिंह पोवार, मुकुंदराव देसाई, मारूती घोरपडे, सुभाष देसाई, अनिल फडके, दिपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील (हात्तीवडे), शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरूकटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, संचालिका रचना होलम, मनिषा देसाई, संचालक काशिनाथ तेली, संभाजी दत्तात्रय पाटील, अशोक तर्डेकर, हरी कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई आणि प्र.कार्यकारी संचालक व्ही.के. ज्योती व अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment