आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
गत तीन वर्षात आजरा नगरपंचायतीवर प्रशासक असतांना सर्वसमान्यांच्या हिताची कामे अन्याय निवारण समितीने केली आहेत. या मुळे अन्याय निवारण समितीला शहरातून मोठे पाठबळ मिळत आहे. जनतेच्या बळावर अन्याय निवारण समिती आघाडी निवडणूक रिंगणात आहे. जनताच समिताच्या सर्व उमेदवारांना विजयी करेल असा विश्वास नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. श्रध्दानंद ठाकूर यांनी व्यक्त केला.
अन्याय निवारण समिती आघाडीच्यावतीने उमेदवारांच्या प्रचारार्थ आजरा शहरात प्रचारफेरी काढण्यात आली. याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आघाडीचे उमेदवार संजय इंगळे, जावेद पठाण, डॉ. स्मिता कुंभार, दत्तराज देशपांडे, रविंद्र पारपोलकर, परशराम बामणे, श्रृती पाटील, आरती मणगुतकर उपस्थित होते.
परशराम बामणे म्हणाले, सत्ता नसतांनाही अन्याय निवारण समितीच्यावतीने शहराच्या विविध प्रश्नांची सोडवणूक केली आहे. वाढीव मालमत्ता कर, अपुरी पाणी योजना, रस्ते, कचरा व्यवस्थापन, भटकी कुत्री अशा नागरीकांच्या जिव्हाळायचे प्रश्न सोडवण्यावर भर दिला आहे. यावेळी सुधीर मुंज, अरुण देसाई, दयानंद भुसारी, सुधीर कुंभार, नाथ देसाई, हर्षद परुळेकर, पांडुरंग सावरतकर, जोतीबा आजगेकर, दिनकर जाधव, भास्कर बुरुड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
================================
Subscribe to:
Post Comments (Atom)
इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण
इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment