आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
राज्य शासनाच्या वतीने दि. 17 सप्टेंबर 2025 ते दि. 31 डिसेंबर 2025 या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरु करण्यार आले आहे. त्या अंतर्गत दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत सोहाळे बाची (ता. आजरा) च्या वतीने मान्यवरांच्या उपास्थितीत या अभियानाचा मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून नूतन गटविकास अधिकारी सुभाष सावंत उपस्थित होते. "गावच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण काम करण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली असून लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन त्यांनी केले. सोहाळे गावच्या लोकनियुक्त सरपंच भारती डेळेकर यांनी उपास्थितांना मार्गदर्शन करताना, "आपल्या गावाचा सर्वांगीण व शाश्वत विकास होण्यासाठी या अभियानात, गावातील सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी प्रशासनाच्या वतीने सहा. गटविकास अधिकारी दिनेश शेटे, विस्तार अधिकारी कुंभार, ग्रामपंचायत सोहाळे ग्रामविकास अधिकारी अजित रणदिवे, ग्रा.पं. चे सर्व सदस्य व कर्मचारी, मंडळ अधिकारी सुंदर जाधव, महसूल अधिकारी रेखा कांबळे, कृषी अधिकारी मनीषा पाटील, आरोग्य विभागाचे अधिकारी कांबळे, विद्या मंदिर सोहाळे व अंगणवाडीचे सर्व शिक्षक वृंद बचत गटाचे समन्वयक, आणि पोलीस पाटील सोहाळे व बाची यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपास्थित होते.
===================
Subscribe to:
Post Comments (Atom)
सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...
गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क... संक्रातीच्या सणादिवशी पतंग उडवत असताना लाकडी ओंडका अंगावर पडल्याने आदर्श किरण पोवार (वय 11, सध्या...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोहाळे पैकी सोहाळेवाडी (ता. आजरा) येथील प्रशां...
No comments:
Post a Comment