आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
राज्य शासनाच्या वतीने दि. 17 सप्टेंबर 2025 ते दि. 31 डिसेंबर 2025 या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरु करण्यार आले आहे. त्या अंतर्गत दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत सोहाळे बाची (ता. आजरा) च्या वतीने मान्यवरांच्या उपास्थितीत या अभियानाचा मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून नूतन गटविकास अधिकारी सुभाष सावंत उपस्थित होते. "गावच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण काम करण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली असून लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन त्यांनी केले. सोहाळे गावच्या लोकनियुक्त सरपंच भारती डेळेकर यांनी उपास्थितांना मार्गदर्शन करताना, "आपल्या गावाचा सर्वांगीण व शाश्वत विकास होण्यासाठी या अभियानात, गावातील सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी प्रशासनाच्या वतीने सहा. गटविकास अधिकारी दिनेश शेटे, विस्तार अधिकारी कुंभार, ग्रामपंचायत सोहाळे ग्रामविकास अधिकारी अजित रणदिवे, ग्रा.पं. चे सर्व सदस्य व कर्मचारी, मंडळ अधिकारी सुंदर जाधव, महसूल अधिकारी रेखा कांबळे, कृषी अधिकारी मनीषा पाटील, आरोग्य विभागाचे अधिकारी कांबळे, विद्या मंदिर सोहाळे व अंगणवाडीचे सर्व शिक्षक वृंद बचत गटाचे समन्वयक, आणि पोलीस पाटील सोहाळे व बाची यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपास्थित होते.
===================
Subscribe to:
Post Comments (Atom)
इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण
इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment