Sunday, January 19, 2025

वजन-मापे विभागाच्या भरारी पथकाच्या तपासणीत वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे वजन काटे निर्दोष

आजरा, वृत्तसेवा :
शनिवार दि. 18 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे आदेशाने निरीक्षक वैद्यमापन शास्त्र व इतर अधिकारी यांचे भरारी पथकाने वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे दोन्ही ऊस वजन काटयाची तपासणी करण्यासाठी सकाळी अचानक भेट दिली व दोन्ही वजन काट्यांची संपुर्ण पडताळणी केली. त्यांनी तपासणी कामी ट्रक व ट्रॅक्टर अशा पुर्वी वजन केलेल्या व नविन वाहनांची वजने घेतली. तसेच 8 टनाची वजने प्रत्यक्षात ठेवून पडताळणी केली त्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आली नाही. त्यामुळे वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे ऊस, साखर व उपपदार्थ वजन करणारे सर्व काटे बिनचूक व निर्दोष असलेचे स्पष्ट झाले. काटे बिनचूक असलेचा अहवाल भरारी पथक अधिकारी यांनी कारखान्यास सादर केला. वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना हा गडहिंग्लज उप विभागातील सहकारी साखर कारखाना असून, या कारखान्याच्या वजन काटयाबाबत ऊस पुरवठादार शेतक-यांमध्ये नेहमीच विश्वासार्हता आहे. सदर तपासणीमुळे ती विश्वासार्हता पुन्हा वृध्दींगत झाली आहे.
भरारी पथकाचे अधिकारी एम.व्ही.देसाई (निवासी नायब तहसिलदार), आजरा, व्ही.एल.लाखे (आजरा पोलिस स्टेशन प्रतिनिधी),  शिवदास भिवसन सोनवणे (लेखापरिक्षक श्रेणी-1 अधिन, तृतीय विशेष लेखापरिक्षक, वर्ग-1 सह. संस्था (साखर) कोल्हापूर), अविनाश अरूण शिंगाडी (निरीक्षक वैद्यमापन शास्त्र, गडहिंग्लज विभाग गडहिंग्लज), नजिर महमद लमतुरे, विनोद प्रभाकर चव्हाण,  अब्दुल रशिद नौरूद्दीन (शेतकरी प्रतिनिधी), तुकाराम मारूती मोळे (केनयार्ड सुपरवायझर) यांचे समक्ष काटयांची तपासणी केली. त्यावेळी चेअरमन वसंतराव धुरे, संचालक मुकूंदादा देसाई, अनिल फडके, तज्ञ संचालक रशिद पठाण, प्र.कार्यकारी संचालक व्ही. के. ज्योती, जनरल मैनेंजर (प्रोडक्शन) एस. के. सावंत ऊस पुरवठादार शेतकरी, केनयार्डचे कर्मचारी, सर्व वाहन मालक व चालक प्रत्यक्ष उपस्थित होते.
================

No comments:

Post a Comment

कोल्हापुरी चप्पल्स बाबत गैरसमज पसरवू नयेत : जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर जिल्ह्याच्या लौकिकाचा अविभाज्य भाग असलेल्या कोल्हापुरी चप्पलांविषयी काहीही गैरसमज कि...