Monday, March 28, 2022

भारतात कुठे आहे सोने? कसे काढले जाते खाणीतून सोने? जाणून घ्या.....


🌟 भारतात कुठे आहे सोने? कसे काढले जाते खाणीतून सोने? जाणून घ्या.....

≛≛≛≛≛≛≛≛≛≛≛≛≛≛≛≛≛≛≛≛
✎ भारतात सोन्याचे किती साठे आहेत?  
केंद्रीय खनिजकर्म उद्योगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सोन्याच्या खाणीत एकूण  ७०.१  टन इतके सोने आहे. यापैकी सर्वात जास्त सोने म्हणजे तब्बल ८८ टक्के  सोने हे एकट्या कर्नाटकातील खाणींत आहे, तर आंध्र प्रदेशात १२ टक्के आणि झारखंडमध्ये ०.१ टन सोने आहे. कर्नाटकातील रायचूरमध्ये हट्टी गोल्ड माइनमध्ये सर्वप्रथम १९४७ साली सोन्याचे उत्खनन सुरू झाले. तेव्हापासून २०२० पर्यंत या खाणीतून एकूण ८४ टन सोन्याचे उत्पादन घेण्यात आले आहे. मात्र, यातील उत्पादनाचा वेग तुलनेने अत्यल्प म्हणजे केवळ १.९ टन इतकाच आहे. 

जगात वर्षाकाठी होणाऱ्या सोने खरेदीमध्ये भारत आणि चीन हे दोन देश आघाडीवर आहेत. या दोन्ही देशांतर्फे एकूण जागतिक सोने खरेदीच्या  ५७ टक्के खरेदी केली जाते.  भारतीयांच्या घरात असलेल्या सोन्याचा अंदाजित आकडा हा २२ हजार ५०० टन इतका असून, त्याची किंमत १ ट्रिलियन अमेरिकी डॉलरच्या घरात आहे. २०२१ च्या आर्थिक वर्षात भारतात अडीच ट्रिलियन डॉलर सोन्याची आयात झाली. रुपयांत २.५ या आकड्यावर पुढे किमान १४ शून्य लागतात. २०२० या वर्षामध्ये भारतात एकूण ४४६.४० मेट्रिक इतक्या भरभक्कम सोन्याची खरेदी झाली. सोने आपल्यापर्यंत अत्यंत चकचकीत स्वरूपात येते. मात्र, आपल्यापर्यंत येणाऱ्या सोन्याचा प्रवास मात्र क्लिष्ट आहे.भूगर्भ शास्त्रज्ञांमार्फत तपासणी झाली आणि एखाद्या जागी सोन्याचे साठे सापडल्यावर, ती जागा अधिग्रहित करण्यापासून सोने निर्मितीचा प्रवास सुरू होतो. एकदा ही जागा ताब्यात आली की, सर्वप्रथम तिथे मशीनच्या सहाय्याने खोदकाम सुरू होते. सोने असे वरवर मिळत नाही, तर त्याकरिता भूगर्भात किमान साडेतीन किलोमीटर आतपर्यंत शिरावे लागते. तिथंवर शिरल्यानंतर, ज्या खडकांमध्ये सोने लपले आहे ते खडक दिसू लागतात. ड्रिलिंग मशीनच्या साहाय्याने हे खडक फोडले जातात आणि ते ट्रॉलीच्या माध्यमातून जमिनीपर्यंत पाठविले जातात. जमिनीवर आलेले खडक नजीकच्याच प्रकल्पात नेऊन त्याचे क्रशिंग होते. अर्थात, या खडकांचे अत्यंत बारीक तुकडे केले जातात. क्रशिंग केल्यानंतर सायनाइड आणि कार्बन यांच्या मिश्रणात हे खडक भिजविले जातात. या दोन्ही रसायनांमध्ये दगड पूर्णतः वितळतो आणि कार्बनचे कवच धारण करत कच्चे सोने दिसू लागते.या प्रक्रियेनंतर अत्युच्य तापमानात हे कच्चे सोने वितळविले जाते आणि यातून कार्बन उडून जातानाच, शुद्ध सोन्याचे चकाकते रूप डोळ्यांना दिसू लागते. सोन्याची शुद्धता ही या पातळीवर ठरते. किती सर्वोच्च तापमानाला सोने वितळविले आहे आणि त्यातून किती टक्के शुद्धता मिळू शकते, हे तेव्हा समजते. सरासरी ९९.५ टक्के शुद्धतेपर्यंत सोने गाळण्याचा उच्चांक जगात प्राप्त झालेला आहे. गाळलेल्या सोन्यातून मिळालेले बारीक सोनेरी कण हे पुढे उत्पादन प्रकल्पात पाठविले जातात आणि तिथे बाजारपेठेच्या मागणीनुसार, त्याची वीट, बिस्किटे, चीप अशी बांधणी होते आणि तिथून मग हे सोने खुल्या बाजारात आपल्यापर्यंत विक्रीसाठी येते.   
⇶⇶⇶⇶⇶⇶⇶⇶⇶⇶⇶⇶

Saturday, March 26, 2022

*उन्हाळ्यात पाण्यात भिजवून ‘शेंगदाणे' खा, निरोगी आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर*


*उन्हाळ्यात पाण्यात भिजवून ‘शेंगदाणे' खा, निरोगी आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर*


हिवाळ्यात शेंगदाणे खाणे फायदेशीर असते असे सांगितले जाते, मात्र उन्हाळ्याच्या दिवसांतही कच्चे शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात भाजलेल्या शेंगदाण्याऐवजी कच्चे शेंगदाणे पाण्यात भिजवून किंवा उकळवून खाल्ल्यास अनेक समस्यांवर मात करता येते. भिजवलेल्या शेंगदाण्यांच्या सेवनाने लठ्ठपणा, अशक्तपणा दूर होतो. तसेच गॅस, अॅसिडिटी आणि अपचन यासारख्या समस्यांवर मात करता येते. भिजवलेल्या शेंगदाण्याचे सेवन केल्याने लठ्ठपणा, अशक्तपणा आदी समस्या दूर होतातच, शिवाय हृदयालाही ठेच लागते. जाणून घेऊया उन्हाळ्यात भिजवलेले कच्चे शेंगदाणे खाण्याचे काय फायदे..

 *ह्रदयाचे आरोग्य सुधारते* 

कच्चे शेंगदाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खाल्ले तर रक्ताभिसरण सुधारायला मदत होते. ह्रदय निरोगी राहायला मदत होते. ह्रदयाच्या निरोगी आरोग्यासाठी पाण्यात भिजवून ठेवलेले कच्चे शेंगदाणे खाणे फायदेशीर ठरते.

 *सांधेदुखीवर गुणकारी* 

रात्री पाण्यात भिजत घातलेले शेंगदाणे सकाळी खाल्ले तर सांधेदुखी, कंबरदुखी दूर व्हायला मदत होते. शेंगदाण्यामध्ये प्रथिने आणि कॅल्शियम असते. यामुळे या विकारांनी त्रस्त असलेल्यांनी हा प्रयोग करून पाहावा.

 *कर्करोगापासून संरक्षण* 

कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर मात करण्यासाठी पाण्यात भिजवून ठेवलेल्या कच्च्या शेंगदाण्यांचा उन्हाळ्याच्या दिवसांत आहारात समावेश करा. शेंगदाण्यांमध्ये अँण्टीऑक्सीडंट्स आणि पोषक तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे या आजारांकरिता कच्चे शेंगदाणे खाणे गुणकारी ठरते.

 *स्नायूंच्या मजबुतीकरिता* 

उन्हाळ्यात कच्च्या भिजवलेल्या शेंगदाण्यांचा आहारात नियमित समावेश केल्यास स्नायूदुखी दूर होते. स्नायूंचे आरोग्य सुधारते. स्नायूंना टोनिंग करण्यासाठीही कच्चे शेंगदाणे खाणे फायदेशीर आहे.

 *अॅसिडिटीपासून सुटका* 

उन्हाळ्यात अॅसिडिटीची समस्या जाणवत असेल तर भिजवलेले शेंगदाणे खा. शेंगदाण्यामधील पोटॅशियम, कॉपर, कॅल्शियम, मॅगनीज, आयर्न इत्यादी पोषक घटकांमुळे पोटाशी निगडीत आजार दूर व्हायला मदत होते. अपचनाच्या त्रासापासून सुटका होण्यासाठी हा उपाय प्रभावी आहे.

 *मधुमेहावर गुणकारी* 

भिजवलेले आणि कच्चे शेंगदाणे खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहाते. त्यामुळे मधुमेही कच्च्या भिजवलेल्या शेंगदाण्यांचे सेवन करू शकतात, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या पदार्थाचा आहारात समावेश करावा.

Sunday, March 6, 2022

कलिंगड कापल्याशिवाय (कापायच्या आधी) ते गोड आणि तयार आहे की नाही हे कसे ओळखावे...????


🤔🍉🤔🍉🤔🍉🤔

➖➖➖➖➖➖➖
_*☑ कलिंगड कापल्याशिवाय (कापायच्या आधी) ते गोड आणि तयार आहे की नाही हे कसे ओळखावे...????*_
➖➖➖➖➖➖➖

आता उन्हाळा चांगलाच जाणवू लागलाय... या दिवसात मार्केट मध्ये भरपूर कलिंगडे आलेली असतात... बऱ्याच वेळेस दिसायला छान आणि हिरवे कलिंगड बघून न कापता आपण घरी घेऊन जातो... आणि ते पांढरे निघते... पण ते गोड आणि तयार निघावे या साठी काही परीक्षण आडाखे आहेत...  या द्वारे आपण स्वतः आपल्याला गोड आणि तयार कलिंगड शोधू शकतो....
🔲🔲🔲

*📍आडाखा नं.१: शेतात जमिनीवर टेकलेल्या भागावरील कलंगडाचा बदललेला रंग.... -* कलिंगड व्यवस्तीत पिकला आहे कि नाही याचा अंदाज वरील फोटो वरून लावू शकता. कलिंगड ज्या ठिकाणी जमिनीवर टेकून वाढलेले असते, त्या भागाला ‘फील्ड स्पॉट’ म्हटले जाते. तो कलिंगडाचा भाग पिवळा किंवा केशरी रंगाचा दिसून येतो. जर कलिंगड पिकून तयार असले, तर हा भाग पिवळट केशरी रंगाचा दिसतो हे कलिंगड गोड असते... आणि जर कलिंगड तयार नसेल तर हा भाग पांढरा दिसतो. त्यामुळे कलिंगड खरेदी करताना आधी फील्ड स्पॉटचा रंग पाहण्यास विसरू नये. अर्थात कलिंगड पिवळसर केशरी स्पॉट बघूनच खरेदी करावा, पांढरा स्पॉट असलेले फळ पूर्ण पिकलेले नसते. हिरवेगार कलिंगड कधीच पुरेपूर पिकलेले नसते, जास्त पिवळसर केशरी दिसते ते चवीला हिरव्या, पांढऱ्या किंवा फिकट पिवळ्या पेक्षा अधिक गोड लागेल.

*📍आडाखा नं २: कलिंगडावरील जाळ्या-* कलिंगड घेतांना दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फोटोत दाखविल्याप्रमाणे एखाद्या कलिंगडाच्या सालीवर भुरकट रंगाच्या जाळ्या दिसून येतात. मुख्य म्हणजे, कलिंगडावरील या जाळ्या हे दर्शवतात की मधमाश्यांनी फळाला किती स्पर्श केलेला आहे. जितका मधमाश्यांचा स्पर्श अधिक तितकी अधिक भुरकट जाळी फळावर दिसून येते, आणि जितके भुरकट डाग अधिक, तितके कलिंगड चवीला अधिक गोड असे हे एकंदर गणित आहे.

*📍आडाखा नं ३: कलिंगडाच्या आकार -* कलिंगडात नर आणि मादी असे दोन प्रकार असतात, कलिंगड जर मोठे आणि लंबगोल आकाराचे असेल, तर ते नर कलिंगड असते यात पाण्याचा अंश जास्त असल्यामुळे हे गोडीला थोडे कमी असते... मादी कलिंगड मात्र आकाराने गोल गरगरीत असून हे चवीला गोड असते. त्यामुळे आकार निवडताना कलिंगड जास्त मोठे किंवा छोटे न घेता मध्यम आकाराचे आणि गोल गरगरीत पाहून घ्यावे.....

*📍आडाखा नं ४: कलिंगडाचा देठ... -* कलिंगड निवडताना त्याचा देठ पाहून घ्यावे. कलिंगडात देठाजवळ बाळी (टेन्दरील) सुकली असेल आणि देठ पूर्णपणे वाळलेला असेल तर ते फळ खाण्यास तयार आहे असे समजावे. पण जर कलिंगडाचा देठ हिरवा असेल, तर हे कलिंगड पिकण्याआधीच तोडले गेले आहे आणि ते गोड तर अजिबात लागणार नाही असे समजावे. एकदा वेलीवरून तोडलेले कलिंगड पिकत नाही. त्यामुळे कलिंगड निवडताना देठ पूर्ण वाळलेले कलिंगड निवडावे...

*📍आडाखा नं ५: वजन आणि आवाज...-* कलिंगड घेताना ते पहिल्यांदा उचलून पहावे, हातात घेतल्यावर ते वजनाने जड लागत असेल तर जा ते कापल्यावर गोड असण्याची शक्यता जास्त. हलके कलिंगड कधीही घेऊ नये. शिवाय कलिंगड चारी बाजूंनी थोपटून सौम्य फटका मारून पहावे. जर 'बदबद' असा काहीसा पोकळ भासल्यासारखा प्रतिध्वनी सम आवाज आला तर समजा कलिंगड पिकले आहे. कच्चे असल्यास धातूच्या भरीव वस्तू ठोकल्यावर निघतो तसा आवाज येतो. तयार फळावर हाताने दाब दिल्यास कर्रर असा फळातून आवाज येतो.

➖➖➖➖➖➖➖
🤔🍉🤔🍉🤔🍉🤔

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...