मतदार संघ सुजलाम सुफलाम करण्याचा ध्यास घेतलेले पाणीदार आमदार प्रकाश आबिटकर
कोल्हापूर, वृत्तसेवा :
राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघ निसर्ग संपन्न आहे. पाण्याअभावी मतदार संघातील शेतीचा विकास होऊ शकला नाही. गेल्या 20 ते 25 वर्षापासून या मतदारसंघातील अनेक पाणी प्रकल्प रखडलेले होते. हे लक्षात घेऊन मतदार संघ सुजलाम सुफलाम होण्यासाठी रखडलेले पाणी प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे, याकरता आमदार झाल्यापासून मतदार संघातील पाणी प्रकल्प पूर्णत्वाचा ध्यास घेतलेले आमदार प्रकाश आबिटकर यांनी भुदरगड तालुक्यातील नागणवाडी प्रकल्प पूर्ण केला. त्या पाठोपाठ आमदार आबिटकर यांच्या पाठपुराव्यामुळे यावर्षी आजरा तालुक्यातील सर्फनाला प्रकल्पात 60 टक्क्यापर्यंत पाणीसाठा केला जाणार आहे. याचबरोबर राधानगरी तालुक्यातील धामणी प्रकल्पही पूर्ण व्हावा याकरता आमदार आबिटकर यांची धडपड सुरू आहे. त्यामुळे मतदारसंघात कोट्यावधी रुपयांचा निधी आणून मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलणारे कार्यसम्राट आमदार प्रकाश आबिटकर हे आता पाणीदार आमदार म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत.
आजरा तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरणारा सर्फनाला प्रकल्प आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नाने पूर्णत्वास गेला आहे. हा प्रकल्प सुमारे २४ वर्ष रेंगाळला होता. घळभरणीचे काम पूर्ण झाल्याने यावर्षी या धरणात पाणीसाठा होणार आहे. सन २००० साली या प्रकल्पाला शासकीय मंजुरी मिळाली. सुरुवातीला सोपा असणारा हा प्रकल्प नंतर किचकट होत गेला. नेहमी प्रमाणे पुनर्वसनाचे प्रश्न सुटत नसल्याने संघटना व प्रकल्पग्रस्त पातळीवर विरोध होत गेला. अनेकवेळा काम थांबवले गेले. पुनर्वसन झाल्याशिवाय काम नाही हा निर्धार प्रकल्पग्रस्तांचा असल्याने व त्याची पूर्तता खात्याकडून झाली नसल्याने अनेक वर्षे काम रेंगाळले. अखेर
आमदार आबिटकर यांच्या पाठपुराव्याने पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लागले त्यामुळे पाणीसाठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
*दृष्टिक्षेपात सर्फनाला प्रकल्प*
* ०.६७ टीएमसी पाणीसाठा
* २२१ कोटी रुपये प्रकल्पावर झालेला खर्च
* प्रकल्पांतर्गत आजरा तालुक्यातील २० गावातील २६४४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार
*धरणाची लांबी १४४० मीटर असून उंची ३३.३२७ मी.
*पाणलोट क्षेत्र ११.८८ चौ.किमी.
*बुडीत क्षेत्र २४५.७२ हेक्टर
*सांडव्याची लांबी ८७ मी.
*विसर्ग क्षमता ३३९.६७ घमी/ सेकंद आहे.
*बुडीत क्षेत्रासाठी २८९.२० हेक्टर जमीन संपादन, यामध्ये खासगी २६६.४८ हे.,सरकारी १६.२२ हे व वनखात्याची ६.५० हे.याचा समावेश आहे
*या प्रकल्पांतर्गत शेळप, दाभिल, देवर्डे, साळगांव व सोहाळे हे ५ बंधारे
*लाभक्षेत्रातील गावांमध्ये पारपोली, शेळप, दाभिल, विनायकवाडी, देवकांडगाव, कोरीवडे, हरपवडे, पेरणोली, आल्याचीवाडी, गवसे, दर्डेवाडी, मेढेवाडी, देवर्डे, वेळवट्टी, कुरकुंदे, साळगांव, सोहाळे, बाची, पारेवाडी व पेठेवाडी या गावांचा समावेश
*बुडीत झालेल्या पारपोली व गावठाण या गावांचे पुनर्वसन देवर्डे व शेळप येथे पुनर्वसन वसाहतीमध्ये केले आहे. याठिकाणी सर्व नागरी सुविधा देण्यात आल्या.
===================
No comments:
Post a Comment