Wednesday, August 5, 2020

आजर्‍याचा व्हिक्टोरिया पुल वाहतुकीसाठी बंद


आजरा (प्रतिनिधी) :

कोल्हापूर जिल्ह्यासह आजरा, गडहिंग्लज व चंदगड तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. या परिसरात महापूराची स्थिती निर्माण झाली आहे. हिरण्यकेशी नदी पात्राबाहेरून वाहत आहे. या नदीवरील आजरा शहरानजिकच्या व्हिक्टोरिया पुलावर मच्छिंद्री झाल्यामुळे हा पुल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी दिले आहे. गेल्या १३० वर्षात सलग दुसर्‍या वर्षी व्हिक्टोरिया पुलावर मंच्छिंद्री झाली आहे.

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...