आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
गवसे (ता. आजरा) येथील वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यांने सन 2024-25 हंगामात गळीतास आलेल्या ऊसाला ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना त्यांनी पुरविलेल्या ऊसानुसार प्रति टन अर्धा किलो प्रमाणे व कारखान्याकडे शेअर्स भागभांडवल रक्कम 10 हजार रुपये ते15 हजार रुपयेच्या आतील सभासदांना 25 किलो व शेअर्स 15 हजार रुपयांचा पुर्ण भरणा केलेल्या सभासदांना 50 किलो साखर प्रति किलो 25 रुपये दराप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे. सदर साखर आजरा तालुका खरेदी विकी संघाचे सर्व शाखेतून सोमवार दि. 28 एप्रिल 2025 ते 31 मे 2025 अखेर वाटप केली जाणार आहे.
सभासदांना त्यांची साखर वितरण कार्ड घरपोच दिली जाणार असून, सभासदांनी आपल्या आधार कार्डची झेरॉक्स सही करून कार्ड वाटप करणेंस येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे देवून आपले कार्ड घेणेचे आहे. तसेच ऊस पुरवठादारांनी आपल्या संबंधित संघ शाखेशी संपर्क साधून आपले आधार कार्ड/बैंक पासबुक झेरॉक्स सही करून संघ शाखेत जमा करून साखर उचल करणेची आहे, अशी माहिती कारखाना व्यवस्थापनांने दिली.
कारखान्यांने या हंगामात ठरविलेले गळीताचे उद्दिष्ट नैसर्गिक अडचणीमुळे पुर्ण करता आले नांही. या हंगामात अति पावसामुळे सर्वच ठिकाणाचे 25 टक्के ऊस उत्पादन घटले. त्यामुळे आपल्या कारखान्याचे देखील गळीत कमी झाले असलेंने कारखान्यापुढे आर्थिक अडचणी आहेत. त्याच बरोबर शासनाचे धोरणाप्रमाणे व कारखान्याच्या उपविधी प्रमाणे शेअर्सची रक्कम 15 रुपये पुर्ण असले शिवाय कोणतेही लाभ सभासदांना देणे अडचणीचे असतांना देखील वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपण सर्वांनी मागणी केलेनुसार सभासदांना साखर देणेचे वरील प्रमाणे धोरण ठरविले आहे. त्यानुसार आजरा तालुका खरेदी विकी संघाचे शाखेतून साखर वाटप सुरू होणार आहे. कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून ज्या सभासदांची शेअर्स रक्कम अपुरी आहे, अशा सभासदांनी आपली शेअर्स रक्कम 10 हजार रुपये अथवा 15 हजार रुपये कारखाना कार्यालयात येवून पुर्ण केलेस वरील कालावधीत त्यांनाही साखर देणेचे संचालक मंडळाचे धोरण असून, त्याचा लाभ सभासदांनी घ्यावा. त्याचबरोबर सभासद नसलेल्या कार्यक्षेत्राबाहेरील ऊस पुरवठादार उत्पादकांना देखील प्रतिटन अर्धा किलो प्रमाणे साखर उचल देत आहोत. येत्या गळीत हंगामात आपण उत्पादीत केलेला संपुर्ण ऊस कारखान्यास गाळपासाठी पाठवावा असे अवाहन कारखान्याचे चेअरमन मुकुंद उर्फ उदयसिंह बळीराम देसाई यांनी केले आहे. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन सुभाष देसाई, सर्व संचालक मंडळ सदस्य, कार्यकारी संचालक व अधिकारी उपस्थित होते.
==================
Subscribe to:
Post Comments (Atom)
इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण
इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment