आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या चेअरमनपदी मुकुंद बळीराम देसाई यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी साखर सह संचालक गोपाळ मावळे होते.
चेअरमन पदासाठी मुकुंद देसाई यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. चेअरमनपदासाठी देसाई यांचे नांव वसंतराव धुरे यांनी सुचविले तर विष्णूपंत केसरकर यांनी अनुमोदन दिले. निवडी नंतर बोलताना नूतन चेअरमन देसाई म्हणाले, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ, माजी आमदार राजेश पाटील व माजी आमदार के. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कारखाना सुरू आहे. कारखानदारी सध्या अडचणीत आहे. अडचणीवर मात करत मार्गक्रमण केले पाहिजे. कारखान्याला ऊर्जितावस्था आणण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. यासाठी सर्व संचालकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. नेत्यांनी सोपवलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. आभार व्हाईस चेअरमन सुभाष देसाई यांनी मानले. या निवड सभेस सर्व संचालक, अधिकारी उपस्थित होते. निवडी नंतर विविध संस्था पदाधिकारी यांनी नूतन चेअरमन देसाई यांचा सत्कार केला.
==============
Subscribe to:
Post Comments (Atom)
इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण
इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment