Saturday, February 22, 2025

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचा गळीत हंगामाची सांगता

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :

वसंतराव देसाई आजरा शेतकरी साखर कारखाना गवसे (ता. आजरा) या कारखान्याचा 2024-25 या गळीत हंगामाची सांगता होवून सत्यनारायण पुजा कारखान्याचे व्हा. चेअरमन सुभाष गणपतराव देसाई व त्याच्या सुविद्य पत्नि विजयालक्ष्मी सुभाष देसाई यांचे शुभहस्ते संपन्न झाली. तसेच चेअरमन वसंतराव धुरे व संचालक मंडळाचे शुभहस्ते साखर पोती पुजन संपन्न झाले. या हंगामात कारखान्याने 93 दिवसात 2 लाख 78 हजार 357 मे. टनाचे गाळप करून 3 लाख 31 हजार 250 क्विंटल साखरेचे उत्पादन केले सरासरी उतारा 11.90 इतका मिळाला आहे.

चेअरमन धुरे म्हणाले, हंगाम 2024-25 मध्ये करखान्याने जास्तीत जास्त ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवुन सक्षम तोडणी वाहतुक यंत्रणा उभारली होती. परंतु अती पावसामुळे ऊसाची वाढ न झाल्याने व वातावरणाच्या परिणामामुळे ऊसास अकाली तुरे आलेने सरासरी हेक्टरी उत्पादन कमी होवून साखर उता-यातही त्याचा परिणाम झाला. कारखाना गाळप करणेस सक्षम असुन सुध्दा ऊसा अभावी कारखाना लवकरच बंद करावा लागला. त्यामुळे गाळपाचे ठेवलेले उदिष्ठ पार करू शकलो नाही. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेचे अध्यक्ष ना. हसन मुश्रीफ यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेच्या सहकार्याने कारखान्याकडे गाळपास आलेल्या ऊसाची व तोडणी वाहतुकीची उर्वरीत बिले देखील लवकरच जमा करणार आहे. तसेच आजरा साखर कारखाना स्थापने पासुनच आलेल्या अनेक संकटावर मात करीत खंबीरपणे उभा आहे. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांचा संपूर्ण ऊस वेळेत गाळप करणे व ऊसाचे बिल वेळेत आदा करून भागातील सभासद शेतक-यांना व कामगारांना दिलासा मिळावा हाच उददेश समोर ठेवून कारखाना उर्जीत अवस्थेत आणणेचे ध्येय कारखान्याचे संचालक मंडळाने डोळ्यासमोर ठेवले आहे. कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्रा बाहेरील गडहिंग्लज व चंदगड, आंबोली भागातील कारखान्यास ऊस पुरवठा करणा-या ऊस उत्पादकांच्या सहकार्याने सदर हंगाम संचालक मंडळाच्या प्रयत्नाने पार पाडला आहे. आमच्यावर विश्वास ठेवून ऊस उत्पादकांनी आपला ऊस गाळपास पाठविला तसेच तोडणी वाहतुकदारांनी सुध्दा आमच्यावर विश्वास ठेवून कारखान्यास जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणेस मदत केली. तसेच मालपुरवठादारांनी कारखान्यास माल पुरवठा करून सहकार्य केले. कारखाना कामगारांनी कारखाना पुर्ण क्षमतेने चालावा यासाठी चांगल्या प्रकारे काम केले. तसेच मान्यवरांच्या सहकार्याने कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेने कारखान्यास आवश्यकतो निधी उपलब्ध करून दिला. सदर निधीचा काटकसरीने व योग्य वापर करीत कारखाना व्यवस्थापनाने कारखाना सुरू ठेवला आले. आपल्या सर्वांचे असेच सहकार्य कायम लाभले आहे, असेही चेअरमन धुरे म्हणाले.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक तथा बैंक प्रतिनिधी सुधीर देसाई, कारखान्याचे संचालक विष्णू केसरकर, उदयसिंह पोवार, मुकुंदराव देसाई, मधुकर देसाई, मारूती घोरपडे, अनिल फडके, दिपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील (हात्तीवडे), शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरूकटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, संचालिका रचना होलम, मनिषा देसाई, संचालक काशिनाथ तेली, संभाजी दत्तात्रय पाटील, हरी कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई आणि प्र. कार्यकारी संचालक व्ही. के. ज्योती व अधिकारी उपस्थित होते.
=======================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...