कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ बोर्डाच्या दहावीच्या लेखी परीक्षेला शुक्रवार (दि. 21) पासून सुरवात होत आहे. या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय मंडळाकडून तयारी पूर्ण झाली आहे. कोल्हापूर विभागाअंतर्गत कोल्हापूर, सांगली आणि सातारा हे तीन जिल्हे येतात. तीन जिल्हे मिळून एकूण 1 लाख 32 हजार 926 विद्यार्थी परीक्षा देणार असून यासाठी 357 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हयात एकूण 54 हजार 810 विद्यार्थी परीक्षा देणार असून 138 परीक्षा केंद्रावर या विदयार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आलीय. 2018 पासून ज्या परीक्षा केंद्रावर कॉपी सारखे गैरप्रकार घडलेत, अशा केंद्रांवरील केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि कर्मचाऱ्यांची इतर केंद्रावर नियुक्ती करण्यात आलीय. संवेदनशील केंद्रावर व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार असून कुणीही गैरमार्गाचा अवलंब करून नये, असे आवाहन कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.
============
Subscribe to:
Post Comments (Atom)
सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...
गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क... संक्रातीच्या सणादिवशी पतंग उडवत असताना लाकडी ओंडका अंगावर पडल्याने आदर्श किरण पोवार (वय 11, सध्या...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोहाळे पैकी सोहाळेवाडी (ता. आजरा) येथील प्रशां...
No comments:
Post a Comment